वाई तालुक्यातील केंजळ येथे विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याने तणाव निर्माण झाला आहे. कारण विनापरवाना पुतळा बसविल्याने त्याठिकाणी पोलिस आणि महसूल प्रशासन दाखल झाले आहे. तसेच पोलिसानांनी गावात मोठा पोलिस बंदोबस्त केला आहे. ( wai villegers chhatrapati shivaji maharaj statue)
पुतळा ग्रामस्थ व तिथल्या तरुणांनी काढून घ्यावा आणि परवानगी घेऊन बसवावा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पण पुतळा हटविण्यासाठी तिथले ग्रामस्थ आणि युवक तयार नाहीये. त्यामुळे गावातले वातावरण आणखी तापले आहे. काही गैरप्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीच्या पटांगणात शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञातांनी चबुतरा बांधून शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला होता. याबाबत माहिती मिळताच भुईज पोलिस आणि महसूल प्रशासन गावात दाखल झाले. तसेच गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
शासनाची परवानगी न घेता पुतळा बसविल्याने तो हटवण्याची मागणी पोलिस आणि महसूल प्रशासन करत आहे. पण गावातील लोक हे पुतळा हटवण्यास तयार नाहीये. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारीही याप्रकरणी गावात दाखल झाले आहे.
पोलिस प्रशासन पुतळा हटवण्याच्या मागणीवर ठाम असून गावातील लोक त्याला विरोध करत आहे. पोलिस उपअधीक्षक गणेश केंद्रे, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे आणि तिथल्या ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सुरू आहे.
शुक्रवारी मध्यरात्री गावच्या भैरवनाथ मंदिराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला दर्शनी भागात बसविण्यात आला होता. ही माहिती मिळताच पोलिस आणि महसूल प्रशासन गावात दाखल झाले होते. तसेच ज्यांनी हा पुरळा बसवला आणि त्यांनी तो लवकरात लवकर हटवावा अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या होत्या. पण अजून कोणीच पुढाकार घेतलेला नाही.
महत्वाच्या बातम्या-
अरुण गवळीच्या दारूच्या अड्ड्यावर माझ्या वडिलांनी पैसे मोजण्याचे काम केले, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
‘हमने बहुत बरदाश्त किया है ना..तो बरबाद भी हम ही करेंगे’, संजय राऊतांचा भाजपला गर्भित इशारा
पतीच्या आठवणीत प्रज्ञा सातव भावूक; ‘राजीवजी.. तुम्ही जिथे असाल, तुम्हाला एकच सांगते…’