सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याच्या पत्नीने मोठा खुलासा केला आहे. त्याचबरोबर तिने म्हटले आहे की, पतीची हत्या झाल्यानंतर पाकिस्तानात कोणीही तिची प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. यादरम्यान ती हे ही म्हणाली की, खरे काश्मीर भारतात आहे.
टाईम्स नाऊ नवभारत या वृत्तवाहिनीने मृत दहशतवाद्याची पत्नी ‘रझिया बीबी’ हिचा ऑडिओ जारी केला आहे. ऑडिओमध्ये ती असे म्हणताना दिसत आहे की, हे मुजाहिद घेऊन जातात आणि मग कोणताही विचार न करता लग्न करतात. यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. मी तिथे अनेक रात्री जागून काढल्या आहेत.
मुलांच्या सोईसाठी ती दिवसभर भटकायची. अनेकदा ईदच्या दिवशी मुलांनी नवीन कपडे घातले तर अनेकदा नाही घातले, आम्ही खूप कठीण परिस्थितीतून गेलो आहोत. विचार करूनच पावले उचलली पाहिजेत असे मी म्हणेन. तिच्या ऑडिओमध्ये रझिया बीबी पुढे म्हणताना दिसत आहे की, मुजाहिद माझ्या पतीला न सांगता कुठेतरी घेऊन गेला. तो कुठे जातोय हेही सांगितले नाही.
या प्रकरणामुळे अनेक दिवस लोक त्रस्त असतात. लोकांना महिन्यानंतर कळते. मी एवढेच म्हणेन की कोणीही मुजाहिद बनू नये. यासोबतच तिने आपल्या ऑडिओमध्ये असेही म्हटले आहे की, ती येथे (भारत) खूप आरामात आहे आणि तिला कशाचीही पर्वा नाही.
एएनआय या वृत्तसंस्थेने रझिया बीबीचा व्हिडिओही जारी केला आहे. ज्यामध्ये ती म्हणताना दिसत आहे की, मला इथे येऊन जवळपास १५ दिवस झाले आहेत आणि मी खूप समाधानी आहे. त्याच वेळी, ती असेही म्हणत आहे की भारतात येऊन खूप आराम झाला आणि माझ्या मुलांची काळजी इथे घेतली गेली. माझ्या मुलांना आधार मिळाला म्हणून माझा पाठिंबा यासाठीच असेल. याशिवाय पाकिस्तानात सर्व काही फक्त नावापुरते आहे, तिथे माणुसकी नाही, असेही ती म्हणत आहे.
#WATCH | Razia Bibi, a Kashmiri woman who was married to a Pakistani terrorist & abandoned by Hizb leadership to her fate upon his husband's death, says, "The lives of youths of Kashmir are being ruined by misusing the name of Islam" pic.twitter.com/JqRG4AwgIj
— ANI (@ANI) December 30, 2021
वृत्तानुसार, रजिया बीबी यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी मुझफ्फराबादला नेण्यात आले. २००८ मध्ये रझियाने हिजबुल दहशतवाद्यासोबत लग्न केले. २०१८ मध्ये, बांदीपोरा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक हिजबुल दहशतवादी मारला गेला. पतीच्या निधनानंतर महिनाभरानंतर रजिया बीबी यांना दहशतवादी संघटनांकडून पेन्शन देण्यात आली होती पण नंतर ती बंद करण्यात आली.
कोणतीही मदत न मिळाल्याने रझिया आणि तिच्या मुलांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत गेली. त्यानंतर २०२१ मध्ये रझिया बीबी काठमांडूमार्गे भारतात आली. जिथे ती सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली आहे आणि तिच्या मुलांना शाळेसारख्या आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत.