“मी लढलो नाही, माझा हिमालयात जाण्याचा प्रश्न नाही” कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
यावर्षीच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत भाजपला धूळ चारली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्वकाही पणाला लावणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांनी म्हणले आहे की, “कोल्हापूरची पोटनिवडणूक तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी लढत … Read more