आज समाज इतका पुढे गेला असतानाही काही रुढी परंपरा समाज आजही जपताना दिसून येतो. पण काही रुढी परंपरा या समाजाला कलंकित करणाऱ्या असतात, जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या असतात. एखादी महिला जर विधवा झाली असेल तर तिला खुप चुकीची वागणूक दिली जाते. (rupali chakankar facebook viral)
समाजात विधवा महिलेला दुय्यम दर्जाचे स्थान दिले जाते, जे की खुप चुकीची गोष्ट आहे. महिला जर विधवा झाली असेल तर तिच्या गळ्यातून मंगळसूत्र काढून घेतलं जात. तिला हवं तसं जगू दिलं जात नाही. पण अशा गोष्टीत पुढाकार घेऊन तिला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे.
आता सध्या रुपाली चाकणकरांची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. समाजात एखादी महिला जर विधवा झाली, असेल तर आपण तिला कशी वागणूक दिली पाहिजे, हे रुपाली चाकणकरांनी दाखवून दिले आहे. रुपाली चाकणकरांच्या काकांचे निधन झाले आहे. त्यानंतर तिथे जो प्रसंग घडला, त्याबद्दल रुपाली चाकणकरांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितले आहे. जी भूमिका रुपाली चाकणकरांनी त्यावेळी घेतली त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे.
फेसबूक पोस्ट-
काल पंढरपुर दौरा करुन पुण्याकडे निघताना बंधुचा फोन आला, रात्रीचे ११:३० वाजले असतील, अस्वस्थ होत मला निरोप दिला, काका अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले आहेत, आता हॉस्पिटलला आम्ही सगळे आलो आहोत, तु पोहचण्याचा प्रयत्न कर. हि दुःखद बातमी ऐकुन मला धक्काच बसला.
लहानपणापासुनचा एकत्र कुटुंबातील जीवनप्रवास डोळ्यासमोरुन सरकु लागला,फार मोठ्या एकत्र कुटुंबात वाढले,एकुण सात काका,एक आत्या,सात भाऊ,बारा बहिणी या सर्वांचे एकत्र कुटुंब,हे माझे काका सहा नंबरचे. जेव्हापासून हे जग समजतं तेव्हापासुन त्यांना सैनिकी वेषात पाहिलेले, सैनिक म्हणुन देशसेवा करीत असताना ,गावाला ,कुटुंबाला फार मोठा अभिमान….
ते सुट्टीत घरी आल्यानंतर परत जाताना आजीपासुन ते सगळ्या काकु रडत सामान, प्रवासाची, सोबतच्या जेवणाची तयारी करत, माहेराहुन पाठवणी असत तसा तो निरोपचा कार्यक्रम होत,त्यावेळी ते समजत नव्हतं पण मोठं होताना त्यातील प्रेमाची ओढ जाणवत गेली. माझ्या आईसोबतचा हा फोटो ,मोठी वहिनी कमी आणि बहिण म्हणुन या सगळ्यांनी लहान दिरांना सांभाळले ,आज दोघेही नाहीत ,आहेत त्या फक्त आठवणी.
आज अंत्यविधीच्या वेळी या लहाणपणाच्या या सगळ्या आठवणी फेर धरत होत्या,अंत्यविधी सुरु होताना कोणीतरी आवाज दिला, तोंडात मणी द्यायचा आहे, मंगळसुत्र काढा. उठून पुढे गेले आणि सगळ्यांना सांगितलं काकूचे मंगळसुत्र कोणीही काढायचा प्रयत्न करु नका,त्याऐवजी तुळशीचे पान तोंडात द्या.आता विधी करताना आपण बदल करायचा,तात्काळ ग्रामस्थ व कुटुंबियांनी मान्य केलं. कुंकु न पुसतां.जोडवी न काढतां ,बांगड्या न काढता अंत्यविधी झाला.
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याचे अपार दुःख व मानसिक धक्का असताना ,पतीच्या अंत्यविधीत पत्नीला मिळणारी वागणुक जास्त वेदनादायक असते ,विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत…या सामाजिक क्रांतीच्या विचारात एक पाऊल पुढे टाकताना आपणही सर्वजण सहभागी होऊ या. नव्या उषःकालासाठी
महत्वाच्या बातम्या-
संजय पवारांचे नाव जाहीर करताच राऊतांचा संभाजीराजेंवर निशाणा; म्हणाले, ‘मावळे असतात म्हणून राजे’
संभाजीराजेंना डावलून उमेदवारी दिल्यावर संजय पवार म्हणतात, बाॅस इज अल्वेज राईट अन् उद्धवजी आमचे बाॅस
खासदारकीसाठी अगतिक नाही; अपक्ष म्हणूनच राज्यसभा लढवणार; संभाजीराजे ठाम