Share

सेलिब्रिटी नवऱ्याला होता बाहेरच्या बायकांचा शौक, पत्नीला कळताच प्रसिद्ध अभिनेत्रीला दिला होता चोप

आपल्या कारकिर्दीत अनेक आगळेवेगळे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा आज म्हणजेच ७ एप्रिलला वाढदिवस आहे. ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘सरकार’ आणि ‘कंपनी’ यांसारखे चित्रपट राम गोपाल वर्मा यांनी बनवले आहे, जे की खुप गाजले आहे. (ram gopal varma wife slap urmila matondkar)

सध्या आजकाल ते काहीतरी वेगळं करू लागलेत, त्यामुळे ते चर्चेत येत असतात. पण राम गोपाल वर्मा यांची केवळ कारकीर्दच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही अनेकदा चर्चा होत असते. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींसोबत त्यांचे नाव जोडले गेले. त्यांच्या आणि उर्मिला मातोंडकरच्या अफेअरची खुप चर्चा झाली होती.

असे म्हणतात की राम गोपाल वर्मा यांच्यामुळेच उर्मिलाला प्रसिद्धी मिळाली आणि जेव्हा त्यांच्यातले अंतर वाढले, तेव्हा उर्मिलाचे करिअर त्यांच्यामुळेच उद्ध्वस्त झाले. त्यांचे आणि उर्मिला मातोंडकरांचे अफेअर सुरु असताना राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीने उर्मिलाच्या कानशिलातही लावली होती. आज आपण त्याच किस्स्याबद्दल जाणून घेणार आहोत.

राम गोपाल वर्मा यांचा जन्म हैदराबाद येथे झाला. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना पुस्तके वाचण्यापेक्षा लोकांना वाचायला आवडतं. ते शाळा सोडून चित्रपट बघायला जायचे. असे करत असतानाच ते चित्रपटांच्या प्रेमात पडले आणि त्यांना दिग्दर्शनात हात आजमावून पाहावा असे वाटले.

राम गोपाल यांनी ‘शिवा’ या तेलुगु चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ते बॉलिवूडकडे वळले. येथे त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘रंगीला’ होता. पहिल्याच चित्रपट त्यांचा हिट ठरला. रंगीलामध्ये आमिर खान आणि उर्मिला मातोंडकर दिसले होते. त्यानंतर पुढे राम गोपाल वर्मा यांनी १९९८ मध्ये ‘सत्या’ चित्रपट बनवला होता. हा चित्रपट चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ठरला.

उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा त्या काळात रंगल्या होत्या. असे म्हटले जाते की दोघेही एकमेकांवर खुप प्रेम करत होते. पण त्यावेळी राम गोपाल वर्मांचे लग्न झाले होते. त्या दोघांच्या संबंधांची बातमी वर्मा यांची पत्नी रत्ना यांच्या कानावर पडताच वाद आणखी वाढला होता.

त्यावेळी रत्ना इतकी चिडली होती की तिने अभिनेत्रीला कानशिलातही मारली होती. काही काळानंतर राम आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झाला. तिकडे उर्मिला मातोंडकरनेही आपलं करिअर वाचवण्यासाठी हे नातं संपवलं. अशाप्रकारे राम गोपाल वर्मा यांचे वैयक्तिक आयुष्यही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला मातोंडकरसोबत जवळपास १३ चित्रपटांमध्ये काम केले. असे म्हटले जाते की त्यांनीच अभिनेत्रीचे करिअर चमकवले होते. पण राम गोपाल वर्माचे इतर दिग्दर्शकांसोबतचे संबंध चांगले नव्हते. त्यावेळी उर्मिलाचा आग्रह होता की ती फक्त राम गोपाल वर्मासोबतच चित्रपट करेल. तिच्या या जिद्दीमुळे इतर दिग्दर्शकही उर्मिलापासून दुरावले गेले आणि तिचेही करीअर संपले.

महत्वाच्या बातम्या-
मुलीच्या लग्नासाठी नव्हते पैसे, आईने रचलं थरारक कारस्थान; वाचून बसेल जबर धक्का
VIDEO: मालकासाठी नव्हे तर ‘या’ साठी 8 KM रुग्णवाहिकेच्या मागे धावला घोडा; कारण वाचून रडालं
अंगठे बहादूर महिलेनी केली कमाल! स्ट्रॉबेरी शेतीतून कमवित आहे लाखो रुपये; महिलांसाठी बनली एक प्रेरणास्रोत

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now