सध्या राजकीय वर्तुळात एका पोस्टरची जोरदार चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात सध्या घडामोडींना वेग आला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींत आता कोकणातून एका बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बॅनर चक्क मनसेकडून लावण्यात आलं आहे.
हा बॅनर मनसेचे सरचिटणीस असलेल्या वैभव खेडेकर यांनी लावला आहे. ‘कोकणची भूमी निष्ठावंतांची, गद्दारांना ठोका, ठाकरे ब्रँड वाचवा, अशा आशयाचा हा बॅनर आहे. सध्या राजकीय वर्तुळात याच बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. अजून एक विशेष बाब म्हणजे, ‘ठाकरे ब्रँड वाचवा’ हे ठळक भगव्या अक्षरांत लिहिलं आहे.
शिनसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यात मनसेकडून करण्यात आलेल्या या बॅनर बाजीने आणखी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र यावर अद्याप मनसेचे कोणत्याच नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
तर दुसरीकडे आता पुन्हा एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गट मागे हटायला तयार नाहीत. त्यांनी आता आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. शिंदे गटाने आपल्या गटाचं नाव ठरवलं आहे अशी माहिती माध्यमांमध्ये आली आहे. शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे ठेवले आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, जर तुम्हाला वेगळा गट स्थापन करायचा असेल तर खुशाल करा पण बाळासाहेबांचं किंवा ठाकरे हे नाव वापरायचं नाही. शिवसेना हे नाव वापरायचं नाही.
ठाकरे हे नाव व लावता जगून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. पण तरीही एकनाथ शिंदेंनी त्यांच्या गटाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले आहे. त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. आधीच बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं; ३८ आमदार जमवूनही स्वतंत्र गट स्थापन करता येणार नाही
एकनाथ शिंदेंचा अभ्यास कमी पडला; ३८ आमदार सोबत असूनही आली ‘ही’ वाईट वेळ
भगवान शंकराप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विष प्राषण केलंय; अमित शहा असं का म्हणाले? जाणून घ्या..