याचबरोबर टाटा सन्सचे माजी चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती असणारे सायरस मिस्त्री यांचे रविवारी दुपारी पालघरजवळील एका रस्ते अपघातात निधन झाले. ते अहमदाबादहून मुंबईला येत होते. या मोठ्या घटनेनंतर आता रस्ते अपघातांवरुन मोठी चर्चा सर्वत्रच होत आहे.
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट (Seat Belt) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीटबेल्ट न लावल्यास आरटीओकडून दंड आकारण्यास येईल.
वाचा काय म्हणाले नितीन गडकरी..?
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, ‘आधीपासूनच मागील आसनांवरील प्रवाशांना सीट बेल्ट लावणे हे अनिवार्य आहे. मागच्या सीटवरील प्रवाशांनी पुढच्या सीटप्रमाणे बेल्ट न लावल्यास अलार्म वाजेल. त्यानंतरही त्यांनी बेल्ट लावला नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल.’
दरम्यान, गडकरी या कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाले की, ‘सरकार नवीन तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देत आहे. “कंपन्यांनी तयार केलेले काही डीपीआर सर्वात वाईट आहेत आणि ते देशातील रस्ते अपघातांना जबाबदार असल्याचे गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महत्वाच्या बातम्या
MNS : राज्य हादरले! मनसेच्या बड्या नेत्याला चाकूने भोसकून ठार मारले; हत्येचा थरार ऐकून अंगावर काटा येईल
त्यांना हाफकिन पण दलाल वाटला..; तानाजी सावंताच्या अज्ञानावरून आदित्य ठाकरेंनी झाप झाप झापले
“तू ठाकरे है, तो मैं भी….”, नवनीत राणा पुन्हा उद्धव ठाकरेंवर बरसल्या, वाचा नेमकं काय म्हंटलंय?