आयपीएल प्लेऑफ सामन्यांसाठी प्रशासकीय समितीने नवीन नियम आणले आहेत. क्वालिफायर-1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 मध्ये, जर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि सामना नियमित वेळेत पूर्ण झाला नाही, तर सुपर ओव्हर होईल. त्याचबरोबर अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे अंतिम सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल. क्वालिफायर-1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 मध्ये एकही सामना झाला नाही तर, पॉईंट टेबलच्या आधारे विजेता ठरवला जाईल. गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल.
या तीन सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. त्यामुळे 30 मे हा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. रात्री 8 वाजल्यापासून विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. आयपीएलचे प्लेऑफ सामने कोलकाता आणि अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत.
क्वालिफायर-1 24 मे रोजी कोलकात्यात आणि 25 मे रोजी एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. तेथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, सामना न झाल्यास क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्स आणि एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सला फायदा होऊ शकतो.
24 मे रोजी पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. पण जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर आरसीबी थेट बाहेर होऊ शकते. त्याचवेळी, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे संघ 25 मे रोजी एलिमिनेटरमध्ये आमनेसामने असतील. गुणतालिकेत गुजरात पहिल्या तर राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी लखनौ तिसऱ्या क्रमांकावर आणि आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे.
दुसरा क्वालिफायर (27 मे) आणि अंतिम (29 मे) अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएलनुसार, प्लेऑफ सामन्यात आवश्यक असल्यास सामन्यातील षटकांची संख्या कमीत कमी पाच षटकांपर्यंत कमी केली जाऊ शकते. या पाच षटकांत खेळ पूर्ण झाला नाही तर सुपर ओव्हर होईल. तिथेही निकाल लागला नाही, तर गुणतालिकेत जो संघ अधिक चांगला असेल त्याला विजेता घोषित केले जाईल.
महत्वाच्या बातम्या
अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलंत का? पहा क्युट ‘नुरवी’ चा पहिला फोटो
लाइव्ह मॅचमध्ये पाण्याची बाटली घेऊन फिरत होता अर्जुन तेंडुलकर, बहीण साराने दिले ‘अशा’ पद्धतीने प्रोत्साहन
बाॅलीवूड अभिनेत्री उर्फीचा माज मोडला! मराठी येत नाही म्हणताच पत्रकाराने ‘असा’ शिकवला धडा
सौदी अरेबियाच्या नागरिकांना भारतात प्रवासाला बंदी, इतर १५ देशांबाबतही घेतला मोठा निर्णय