सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे चर्चेचा विषय ठरले आहेत. नुकतीच त्यांची समर्थक आमदारांसह गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये बैठक पार पडली. आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी एक ठराव पास केला. या ठरावाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
या ठरावावर ३४ आमदारांच्या सह्या आहेत. या पत्रात एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे की, मराठी लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला आपल्या तत्वांशी तडजोड करावी लागत आहे. आमचा पक्ष आणि आमच्या पक्षप्रमुखांनी गेल्या वर्षात प्रचंड वैचारिक तडजोड केली आहे.
मविआ सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल शिवसैनिकांमध्ये आणि लोकांमध्ये रोष आहे, असं त्या पत्रात लिहीलं आहे. हे पत्र त्यांनी विधानसभा उपाध्यांना पाठवून दिलं आहे. या पत्रावर एकून ३४ आमदारांच्या सह्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली शंभूराज देसाई यांची सही आहे.
त्यानंतर संजय शिरसाठ, नितीन देशमुख, किशोर पाटील, प्रकाश सुर्वे, राजकुमार पटेल, लता सोनवणे, यामिनी जाधव, सुहास कांदे, विश्वनाथ भोईर, अनिल बाबर, चिमणराव पाटील, शहाजी बापू पाटील, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, बालाजी किणीकर या आमदारांच्या सह्या आहेत.
पत्रात लिहीले आहे की, आमची भाजपसोबत निवडणुकीपुर्वी युती होती. आम्ही एकमताने ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकनाथ शिंदेंनी गटनेते पदी निवड केली होती. अनिल देशमुख नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवरही एकनाथ शिंदेंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नवाब मलिक तुरूंगात असल्यामुळे सरकारची प्रतिमा खराब होत आहे.
आमचे विचार जुळत नसल्याने काँग्रेस राष्ट्रवादीकडून भरपूर त्रास सहन करावा लागला. सेनेच्या विचाराविरोधात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्याने शिवसेनेत प्रचंड असंतोष. मराठी लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला आपल्या तत्वांशी तडजोड करावी लागत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वच्छ आणि प्रमाणिक सरकार देणं अपेक्षित होतं असं त्या पत्रात लिहीलं आहे.
महत्वाच्या बातम्या
नियमित कर्जाचे हफ्ते फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार, ठाकरे सरकारचा निर्णय
अमित शहांचा एकनाथ शिंदेंना मेसेज; उद्धव ठाकरेंनां सांगा तुम्ही चुकीच्या लोकांनी पंगा घेताय…
ईडीची धास्ती! आमदारांच्या बंडाचे लोण आता खासदारांपर्यंत; भाजप सोबत जाण्याची करतायेत मागणी
ठाकरेंना सोडून आमदार शिंदेंसोबत का गेले? शिवसेना आमदाराने सांगितलं खरं कारण