Share

उद्धवस्त ठ…..ने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? अमृता फडणवीसांची जहरी टिका

amruta fadanvis

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरून आरोप – प्रत्यारोपांचा जणू काही जंगी आखाडाच रंगला आहे. हनुमान चालीसाच्या पठणावरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्य एकमेकांसमोर उभे ठाकले. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात आली.

अशातच आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील शिवसेनेला लक्ष केले आहे. राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तेव्हापासून सातत्याने अमृता फडणवीस या सेनेवर टीका करत आहे.

आताही अमृता फडणवीस यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करत शाब्दिक हल्ला चढवला आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये थोडक्यात उत्तर द्यावे; असं लिहीत वसूली, लोडशेडींग, ट्राफिक वरुन सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच त्यांनी ट्विटमध्ये प्रश्न विचारत काही पर्यात दिले आहेत. सध्या राजकीय वर्तुळात अमृता फडणवीस यांच्या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, अमृता फडणवीसांकडून करण्यात आल्याने शिवसेना त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्याच शक्यता आहे. त्यांच्या या ट्विटने आता नवीन वाद वाढणार एवढं मात्र नक्की झालं आहे.

वाचा काय आहे अमृता फडणवीस यांचे ट्विट.. “उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा? बायकोच्या भावाच्या ताब्यात?” असा ट्विटवरून सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी ट्विट करत ऑप्शनची यादीही सादर केली आहे. त्यांनी ट्वट करत लिहले आहे की, थोडक्यात उत्तर धावे; (उत्तर दिलेल्या विकल्पांमधूनच एक किव्हा सर्व पर्याय निवडून धावे).

पुढे ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला आहे. उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा ? 1 वसूली च्या ताब्यात, 2 विकृत अघाडीच्या ताब्यात, 3 लोड shedding च्या ताब्यात, 4 Traffic Jam आणि अव्यवस्थेच्या ताब्यात, 5 गुंडांच्या ताब्यात, 6. बायकोच्या भावाच्या ताब्यात …? असे पर्याय देत अमृता यांनी सेनेवर टिका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
भारतीय क्रिकेटला धक्का, मुंबईच्या वेगवान गोलंदाजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
‘SC-ST, OBC समाजातील लोक उच्च जातीतील लोकांपेक्षा ४ ते ६ वर्षांनी कमी जगतात’; रिपोर्टमधून खुलासा
“पोलीस वाचवायला येणार नाहीत, घरात धनुष्यबाण ठेवा”, भाजपच्या खासदाराने सुचवले सुरक्षेचे उपाय
‘कलम ३७० मुस्लिम द्वेषातूनच हटवले, भारतीय लोकांच्या जीवनात त्यामुळे काहीच फरक पडला नाही’

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now