Share

शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी, सर्वांना मोफत वीज, ५०० ला गॅस सिलींडर; राहूल गांधींनी पाडला घोषणांचा पाऊस

rahul gandhi

राज्यातील राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलेच चर्चेत असते. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राजकारणातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतात. अलीकडे काँग्रेस देशातील वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करणे असो किंवा वाढत्या पेट्रोल दरवाढीवर केंद्र सरकारला धारेवर धरणे असो, अशा कोणत्या ना कोणत्या वादामुळे राहुल गांधी सतत चर्चेत असतात. तर आता जाहीर सभेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल आहे.

आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे गेले होते. यावेळी गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. अनेक मुद्यांवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरले.

वाचा नेमकं राहुल गांधी यांनी काय म्हंटलंय? 

गुजरातमधील अहमदाबादमध्ये सभेत बोलताना राहुल गांधींनी मोठं मोठ्या घोषणा केल्या. ‘गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू,’ असं देखील राहुल गांधी म्हणाले. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस कशी कामगिरी बजवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी म्हंटलं आहे की, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ आणि सर्वसामान्य ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज देऊ. तसेच सत्ता येताच 1000 रुपयांचा गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळणार असल्याचे देखील राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, पुढे जहरी शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ‘गुजरात राज्य हे नशेचं केंद्र बनले आहे. मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ नेले जातात, मात्र मोदी सरकार कारवाई करत नाही. गुजरातमध्ये आंदोलन करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते, ज्यांच्या विरोधात आंदोलन करणार त्यांची परवानगी घ्यावी का?,’ असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर
‘या’ छोट्याश्या चुकीमुळे सायरस मिस्त्रींनी गमावला जीव? अन्यथा आज ते आपल्यात असते, वाचा नेमकं काय घडलं?
पुण्यात डुप्लिकेट मुख्यमंत्र्याची हवा; मंडळांकडून मिळतायत आरतीचे आमंत्रणे, फोटो पाहून थक्क व्हा
Virat Kohali: पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर विराट-अनुष्का झाले इतके नॉटी, जीभ बाहेर काढून एकमेकांसोबत करू लागले..
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now