ऋषभ पंत (Rishabh Pant) आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. 4 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तराखंडमधील रुरकी येथे जन्मलेल्या ऋषभ पंतने अल्पावधीतच प्रगती साधली आहे. ऋषभ पंत मैदानावर खूप शांत वाटत असला तरी यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या ऋषभ पंतची कहाणी दु:ख, वेदना, कष्ट आणि संघर्षाने भरलेली आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासोबत ऋषभ पंतच्या आयुष्याशी संबंधित एक किस्सा शेअर करणार आहोत, जो फार कमी लोकांना माहीत आहे.(You will be emotional reading Rishabh Pant’s biography)
ऋषभ पंतला वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी घर सोडावे लागले होते. ऋषभ पंत क्रिकेटच्या युक्त्या शिकण्यासाठी आईसोबत उत्तराखंडमधून दिल्लीत आला होता. ऋषभ पंतला वडिलांची साथ सोडावी लागली आणि त्याचे वडील आणि बहीण उत्तराखंडमध्ये राहिले. एवढ्या लहान वयात वडिलांची साथ सोडणे कोणत्याही मुलासाठी सोपे नसते.
12 वर्षांचा ऋषभ पंत दिल्लीत आला तेव्हा त्याच्याकडे ना राहायला जागा होती ना तिथे खायला पैसे होते. आर्थिक अडचणींमुळे ऋषभ पंतने आपल्या आईसोबत मोतीबागच्या गुरुद्वारात राहण्याचा निर्णय घेतला, जिथे त्याची आई गुरुद्वारामध्ये लोकांची सेवा करायची आणि दोघेही तिथेच राहून लंगरचे भोजन करायचे. हाच किस्सा ऋषभ पंतसोबत अनेक महिने चालला.
ऋषभ पंत रोज लंगरमध्ये भोजन करत असे आणि सरावाला जात असे. नंतर आई आणि मुलाने दिल्लीतच भाड्याने खोली घेतली. पंतनी इथून जो प्रवास सुरु केला तो पुढे अनेकांसाठी उदाहरण बनला. ऋषभ पंत ना पैसा, ना अन्न, ना घर फक्त इच्छा आणि सबुरी घेऊन पुढे गेला आणि आज तो भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. ऋषभ पंत क्रिकेटमध्ये स्वत:चे नाव कमावत होता पण, आयपीएल 2017 दरम्यान रुरकी येथे त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
वडिलांचे निधन झाल्यानंतरचा तो काळ ऋषभ पंतसाठी कठीण होता, पण इथेही तो थांबला नाही आणि वडिलांच्या मृत्यूनंतर फक्त 2 दिवसांनी आयपीएल खेळण्यासाठी परतला. पुनरागमन करताना पंतने आरसीबीविरुद्ध 33 चेंडूत शानदार अर्धशतक केले. ऋषभ पंत आज भारतातील सर्वोत्कृष्ट विकेटकीपर फलंदाज आहे पण आज त्याचे वडील त्याच्यासोबत नाहीत.
ऋषभ पंतने ऑगस्ट 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले आणि त्याने येथेही आपली क्षमता सिद्ध केली. पराभवाच्या जबड्यातून विजय हिसकावून घेत ऑस्ट्रेलियातील गाबा येथे खेळलेली खेळी कोणीही विसरू शकत नाही. ऑस्ट्रेलियाच्या पराभवात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती.
महत्वाच्या बातम्या-
एकेकाळी जेवण करायला नव्हते पैसै आणि राहायला नव्हते घर, आज करोडोंचा मालक आहे ऋषभ
वयाच्या 23 व्या वर्षीच करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे ऋषभ पंत, एका सामन्याला घेतो एवढी फी
विराट कोहली आणि ऋषभ पंत टी-२० सिरीजमधून बाहेर,या दिग्गज खेळाडूला मिळाली जागा
IND vs WI, T20: ऋषभ पंतचे झाले प्रमोशन, वेस्ट विंडीज मालिकेसाठी मिळाली ही मोठी जबाबदारी