Share

महाराष्ट्रातील विधवा प्रथा कायमची बंद; विधवांबाबत ‘या’ गोष्टी करण्याला कायद्याने बंदी

मुंबई/कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर आता हाच पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. राज्य सरकारने आज एक परिपत्रक जारी करून महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन विधवा प्रथा बंद करण्याचे आवाहन केले आहे. (Widowhood stop)

ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव केला होता. राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी त्याचे पालन करावे, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. हेरवाड ग्रामपंचायतीने 5 मे 2022 रोजी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातले मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या तोडणे, पायातील जोडवी काढणे अशी प्रथा आजही आहे. ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर व सरपंच सुरगोंडा पाटील यांनी घेतला.

कोल्हापुरातील पूर आणि त्यानंतरच्या कोरोनाच्या काळात अनेक कर्ते पुरुष मरण पावले. प्रतिकूल परिस्थितीत विधवेचा आदर केला पाहिजे. सामाजिक बहिष्कार यांसारख्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी ग्रामसभेने याबाबत ठराव केला होता. कोल्हापूर जिल्हा राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखला जातो. हे वर्ष राजर्षींचे जन्मशताब्दी आहे.

शाहू महाराजांनी विधवांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा क्रांतिकारी निर्णय घेतल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले. ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी महिला संघटनाही प्रयत्नशील होत्या. एखादी प्रथा बंद करण्यासाठी कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे, त्यामुळे हेरवाड ग्रामपंचायतीचा ‘पॅटर्न’ सर्व राज्यात लागू करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक अनिष्ट प्रथा, परंपरा संपवण्याची मागणी समाजातील अनेक घटकांकडून होत आहे. प्रबोधनकार ठाकरे, महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलांवरील अन्यायाविरुद्ध अनेकदा क्रांतिकारी लेखन आणि विचार मांडले आहेत.

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now