सलमान खान लग्न कधी करणार? हा असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर प्रत्येक चाहता शोधत आहे. आपल्या लाडक्या भाईजानच्या लग्नाबद्दलही चाहते अस्वस्थ आहेत. आता सलमान कधी लग्न करेल हे कोणालाच माहीत नाही, पण त्याने लग्न का केले नाही याचा खुलासा सलमानचे वडील सलीम खान यांनी केला आहे. सलीम खानने(Salim Khan) एका शोमध्ये सांगितले होते की, अशी कोणती गोष्ट आहे जी सलमानला लग्न करण्यापासून रोखते.(why-didnt-salman-khan-get-married-why-do-breakups-happen-every-time-father-salim-khan)
सलमान खानचे(Salman Khan) सोमी अलीपासून संगीता बिजलानी आणि कतरिना कैफ पर्यंत नाते होते. या सर्व नायिकांसोबत सलमानच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. संगीता बिजलानीसोबत तर सलमानच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली होती. मात्र अभिनेत्याने केलेल्या विश्वासघातानंतर संगीता बिजलानीने(Sangeeta Bijlani) त्याच्यासोबतचे नाते कायमचे तोडले. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सलमानने स्वतः याचा खुलासा केला होता.
![]()
आता सलमान खान कधीच लग्न करणार नाही असे सांगत आहे. जेव्हाही त्याला लग्नाचा प्रश्न विचारला जायचा तेव्हा तो एकतर हसत असे किंवा गमतीने म्हणत असे की लग्न झाले आहे. पण सलमान इच्छा असूनही लग्न करू शकला नाही याचे कारण काय? तर एक काळ असा होता की सलमानला लग्न करायचे होते. त्यांना मुलं असावीत अशी इच्छा होती.
यासाठी सलमानने त्याच्या लग्नाची तारीखही निश्चित केल्याचे बोलले जात आहे. ही तारीख होती 18 नोव्हेंबर 1999. हीच तारीख होती ज्या दिवशी सलमानचे आई-वडील म्हणजेच सलीम खान आणि सलमा यांचे लग्न झाले होते.
पण लग्नाच्या आठवडाभर आधी सलमानने अचानक लग्नाचा निर्णय बदलला. सलमान आणि साजिद नाडियादवाला(Sajid Nadiadwala) यांनी एकाच दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण लग्नाच्या एक दिवस आधी त्याने साजिद नाडियाडवालाला फोन करून सांगितले की यार, माझा मूड नाही. यानंतर साजिद नाडियादवालाचे जिथे लग्न झाले, तिथे सलमान बॅचलर राहिला.
![]()
पण असे काय कारण आहे की लग्नात पोहोचताना सलमान खानने काढता पाय घेतला? अखेर, सलमानचे ऐश्वर्या आणि कतरिनाचे नाते का बिघडले? फराह खानच्या ‘तेरे मेरे बीच में’ या चॅट शोमध्ये सलीम खानने याचा खुलासा केला होता. वास्तविक या शोमध्ये सलीम खानचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये सलीम खान याबद्दल बोलत होते.
सलीम खान म्हणाले होते, ‘सलमान प्रत्येक नात्यात आई शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्याचे नाते तुटते. प्रेम तर स्टारशी, नायिकेशी होते जिच्यासोबत आपण काम करतो, जवळीक असते. पण नंतर तो त्याच्या आईला तिच्या आत शोधतो, ती सापडत नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या याच कारणामुळे आहेत.
कदाचित याच कारणामुळे सलमान खान वयाच्या 56 व्या वर्षीही सिंगल आहे. पण चाहते अजूनही वाट पाहत आहेत की त्यांचा लाडका भाईजान कधी लग्न करून सेटल होईल. त्याचे मित्रही या क्षणाची वाट पाहत आहेत. सलमानच्या ईद पार्टीत जेव्हा चाहत्यांनी अभिनेत्याला करिश्मा कपूरसोबत(Karisma Kapoor) पाहिले तेव्हा ते सोशल मीडियावर प्लीज लग्न कर असे म्हणतानाही दिसले. पण आता हा ‘टायगर’ कधी लग्न करणार, हे त्याच्याशिवाय कोणालाच माहीत नाही.






