Share

‘जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार?’; सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

सध्या राज्यात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष यांच्यातील वाद-प्रतिवाद वाढला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या नेहमीच शिवसेना आणि एकूणच महाविकास आघाडीवर निशाणा साधताना दिसतात. आता नुकताच सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर निशाणा साधला आहे.

कल्याणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता. यावेळी ते बोलत होते. दरम्यान त्यांनी रश्मी ठाकरे यांच्या मालकीच्या अलिबागमधील कथित 19 बंगल्यांच्या मुद्द्याला हात घातला आणि यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. म्हणाले, जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार?

किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी 19 बंगल्याच्या प्रकरणात 2019 आणि 2021 साली ग्रामपंचायतींना दोन पत्रं लिहिली. यातल्या पहिल्या पत्रात 19 बंगले आमच्या नावावर करा, अशी मागणी करण्यात आली. तर दुसऱ्या पत्रात तिथे बंगले नव्हते, असं रश्मी ठाकरे यांनी म्हटलं. असा आरोप सोमय्या यांनी केला.

पुढे म्हणाले, ही दोन्ही पत्रं दाखवत यावर उद्धव ठाकरे कालच्या सभेत का बोलले नाहीत? तसंच ही दोन पत्रं लिहिणाऱ्या 2 रश्मी ठाकरे आहेत? की उद्धव ठाकरेंच्या 2 बायका आहेत? की एकाच रश्मी ठाकरेंनी दोन्ही पत्रं लिहिली आहेत? की उद्धव ठाकरेंनी ही पत्रं लिहिली आहेत?, अशा प्रश्नांची सरबत्ती सोमय्या यांनी केली.

यावरून म्हणाले, जो बायकोचा होऊ शकत नाही तो महाराष्ट्राचा काय होणार? अशा शब्दांत सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी बोचरी टीका केली. म्हणाले, संजय राऊत शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा भोंगा आहेत.

संजय राऊत ज्या काही शिव्या देतात त्या सर्व उद्धव ठाकरेंच्या डोक्यातून येत असतात. तुम्ही आमची लायकी काढत असता, पण आधी तुमची लायकी काय आहे हे बघा. असे सोमय्या यावेळी म्हणाले. आता सोमय्या यांच्या टीकेला शिवसेना काय प्रतिउत्तर देणार हे पाहावं लागेल.

राजकारण

Join WhatsApp

Join Now