Share

औरंगजेबासारख्या जुलमी लोकांनी आमची मुंडकी कापली पण तरीही आम्ही आमचा धर्म सोडला नाही

शीख गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. भाषण करताना त्यांनी मोठं विधान केले, त्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, लाल किल्ल्याजवळील गुरुद्वारा गुरू तेग बहादूर यांच्या त्यागाचे प्रतीक आहे. आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी तेग बहादूर यांनी किती मोठा त्याग केला आहे, याची आठवण आपल्याला गुरुद्वारा करून देते. त्या काळात देशात धार्मिक कट्टरतावाद होता. भारतामध्ये धर्म म्हणजे एक तत्त्वज्ञान, विज्ञान मानले जायचे.

अशा वेळी गुरू तेगबहादूर यांच्या रूपात एक मोठी आशा भारताची ओळख टिकविण्यामध्ये होती. औरंगजेबासारख्या जुलमी विचारांपुढे गुरू तेगबहादूर अत्यंत खंबीरतेने उभे राहिले. औरंगजेब आणि त्याच्यासारख्या जुलमी लोकांनी अनेकांना मारल्याचा लाल किल्ला साक्षीदार आहे,  औरंगजेबासारख्या जुलमी लोकांनी आमची मुंडकी कापली पण तरीही आम्ही आमचा धर्म सोडला नाही. गुरू तेगबहादूर यांच्यामुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली आहे, असे मोदी म्हणाले.

तसेच म्हणाले, भारताने कधीच कोणत्याही समाजाला दुखावले नाही. आज जागतिक संंघर्षाचा काळ असतानाही भारत जगाच्या कल्याणाचाच विचार सर्वप्रथम करत आहे. आम्ही ‘आत्मनिर्भर भारत’ हा संकल्प करतो तेव्हा त्यामागे व्यापक दृष्टीकोन आहे.

तो व्यापक दृष्टिकोन म्हणजे, अवघ्या जगाला प्रगतीचा मार्ग दिसला पाहिजे हा आहे. हे नमूद करत असताना नवा विचार, अपार कष्ट आणि शतप्रतिशत समर्पण भाव हीच शीख समाजाची खरी ओळख असल्याचे गौरवोद्गार मोदींनी काढले, आणि गुरू तेग बहादूर यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण केले.

यावेळी, नरेंद्र मोदींनी आवाहन देखील केले की, आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. पुढे स्वातंत्र्याला शंभर वर्षे होतील तेव्हा एक नवा भारत आपल्याला दिसेल. म्हणून प्रत्येक क्षण देशहितासाठी खर्ची घालण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन त्यांनी केले.

राजकारण

Join WhatsApp

Join Now