अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी मिळाली आहे. या सभेला परवानगी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झालेला होता. पण आता पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र सभेसाठी काही अटी पोलिसांनी दिल्या आहेत.महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी १६ अटी घातल्या आहे.
या अटींची अंमलबजावणी आणि जातीय तेढ निर्माण होण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले आहे. औरंगाबादेत होणाऱ्या सभेआधी राज ठाकरे काल पुण्यात पोहोचले होते. राज ठाकरे आज पुणे येथून औरंगाबादला निघणार आहेत. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे कालच राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे औरंगाबादमध्ये पोहोचले होते. आज सकाळी अमित ठाकरे यांनी सभास्थळाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे.
यावेळी पत्रकारांनी अमित ठाकरे यांना पोलिसांनी दिलेल्या अटींबद्दल विचारले. राज यांच्या सभेला पोलिसांकडून अनेक अटी आणि नियम घालून देण्यात आल्या आहेत. सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या आवाजाच्या ७५ डेसिबलच्या मर्यादेचं पालन कसं होणार? असं अमित ठाकरेंना विचारलं.
यावर भाष्य करताना अमित ठाकरे म्हणाले, ‘आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत आणि अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार आहोत, असं मोठं विधान अमित ठाकरे राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. तसेच महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी १६ अटी घातल्या आहे.
पोलिसांनी या सभेसाठी १६ अटी घातल्या असून त्यात ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच कोणताही जाती, धर्म, प्रांत, वंश आणि जात यावरुन आक्षेपार्ह विधाने करु नये. सभेच्या आधी मिरवणूक काढू नये, अशा काही अटी पोलिसांनी या सभेसाठी घातल्या आहे.