उत्तर प्रदेशमधील नंदिनी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना महंतांनी राज ठाकरे यांना एका आठवड्यात माफी मागा, अन्यथा ‘छटी का दुध याद दिलाएंगे’ असा थेट इशारा दिला आहे. यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आला आहे.
काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर राजकारण चांगलेच रंगलेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे राज यांनी अयोध्या दौऱ्याबाबत केलेल्या घोषणेनंतर मनसैनिक तयारीला लागले आहेत.
मात्र अशातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली.
तर आता नंदिनी नगर येथे आयोजित सभेत महंतांनी राज ठाकरे यांना लक्ष केलं आहे. “माझ्या हातात धर्मदंड आहे. राज ठाकरे यांनी याआधी उत्तर भारतीयांचा जो अपमान केला आहे. त्यासाठी त्यांनी माफी मागावी. राज ठाकरे यांनी माफी मागितली, तर त्यांचं स्वागत होईल,” असं त्यांनी म्हंटलं आहे.
मात्र राज ठाकरेंनी माफी मागितली नाही, तर त्यांना ‘छटी का दुध याद दिलाएंगे. उत्तर भारतीयांचा अपमान करणारा कोणीही ‘माई का लाल’ जन्माला आलेला नाही,’ अशा शब्दात महंतांनी राज ठाकरे यांना ठणकावून सांगितलं आहे. यामुळे आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याने वातावरण चांगलच तापलं आहे.
दरम्यान, आता राजकारण चांगलच तापणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या घरापासून नवाबगंज भागात रॅली काढली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. यामुळे आता राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र अशातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली.
पुढे राज ठाकरेंना लक्ष करताना ब्रिजभूषण सिंह म्हणाले, ‘२००७ पासून २०२०-२१ पर्यंत राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ केली. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आता त्या व्यक्तीचं ह्रदयपरिवर्तन झालंय. आणि ते आज अयोध्येला येत आहेत, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
संभाजीराजे-देवेंद्र फडणवीस भेट; नवा पक्ष स्थापन करण्याबद्दल स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंगांचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, बाळासाहेबांनी उत्तर प्रदेशची…
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा विषय शरद पवारांनी एका वाक्यात मिटवला; म्हणाले…
‘तुमचे आमदार निर्दोष, अनिलबाबू लवकर बाहेर येतील,’ रोहितदादांनी दिला शब्द