Share

उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ, ईडीकडून होऊ शकते चौकशी, सोमय्यांनी घेतली कोर्टात धाव

महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आले आहेत. रायगडमधील मुरुड तालुक्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्तेविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिका स्वीकारली आहे. मात्र, अद्याप सुनावणीची तारीख निश्चित झालेली नाही.(Uddhav Thackeray, Kirit Somaiya, Ravindra Vaikar, Manisha Vaikar, Directorate of Enforcement)

याचिकेत उद्धव ठाकरे यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी रश्मी, शिवसेना आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचीही नावे नमूद करण्यात आले आहे. सोमय्या यांनी विचारलेली ही मालमत्ता सीएम ठाकरे यांच्या पत्नी रश्मी आणि शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नीने महाराष्ट्रातील रायगडमधील मुरुड तालुक्यात मिळून खरेदी केली होती.

या मालमत्तेची पर्यावरण मंत्रालयाकडून चौकशी करण्याची मागणी भाजप नेत्याने केली आहे. याशिवाय, त्यांनी अलिबागमधील मालमत्तेसंदर्भात सीएम ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या कथित ‘बेकायदेशीर’ प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. याचिकेनुसार, रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी मालक अन्वय नाईक यांच्याकडून वादग्रस्त मालमत्ता २ कोटी रुपयांना विकत घेतली होती, त्यापैकी केवळ १० लाख रुपये दिले गेले. सोमय्या यांच्या मते, ‘हे आयकर कायद्याच्या कलम १९६१ (२६९)ST चे उल्लंघन आहे.

यह प्रॉपर्टी रायगढ़ जिले में मुरुद कोरलाई गांव में बताई जा रही है।

सोमय्या यांनी याचिकेत उद्धव ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेवरील बांधकाम लपवून त्यांचे अवमूल्यन केल्याचे म्हटले आहे. हे लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या तरतुदींचे उल्लंघन आहे. सोमय्या यांनी तपास अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याची मागणी केली आहे. यासोबतच मालमत्तेची स्थिती, त्यातील बांधकाम आणि पेमेंट पद्धतीची चौकशी करण्यास सांगितले आहे.

सोमय्या म्हणाले की, ग्रामपंचायतीने जारी केलेल्या मालमत्ता कराच्या पावतीवरून हे सिद्ध होते की जमिनीवर बांधकाम केले जात आहे. सोमय्या यांनी दावा केला की, जमिनीवरील बांधकाम पाहता त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे दिसते. त्यांच्या म्हणण्यानुसार ही मालमत्ता तटीय नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आली आहे. हे समुद्रकिनाऱ्यापासून १०० मीटरच्या आत आहे.

सोमय्या यांनी दावा केला की कथित मालमत्ता आरक्षित वनक्षेत्रात येते आणि रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी तिच्या बांधकामासाठी पर्यावरण किंवा वन विभागाकडून कोणतीही मंजुरी घेतलेली नाही. यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीचे ११ फ्लॅटही सील करण्यात आले आहेत. ही मालमत्ता सुमारे ६.४५ कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. पुष्पक बुलियन कंपनी गैरव्यवहार प्रकरणात पीएमएलए कायद्यांतर्गत ईडीने ही कारवाई केली आहे. श्रीधर पाटणकर यांच्या नंद किशोर चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीसोबतच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारात ही कारवाई करण्यात आली. नंद किशोर चतुर्वेदी यांच्यावर पुष्पक बुलियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारात आरोपी महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल यांचे भागीदार असल्याचा आरोप आहे. ईडीने २०१७ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात दोघांवर कारवाई केली होती.

महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंसाठी ममता बॅनर्जी मैदानात? गुवाहाटीतील हॉटेलवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांची धडक
वर्षा बंगला सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंवर राष्ट्रवादी नाराज, अजित पवारांच्या घरी पार पडली बैठक
अनुभवच नव्हता तर मुख्यमंत्री का झाले सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना उलट प्रश्न
गद्दारी करू नका, राजीनामा पाहिजे असेल तर समोर येऊन बोला, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now