shivsena : शिवसेनेनेला लागलेली गळती काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केले. शिंदे यांच्या बंडामुळे भाजपला देखील पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली. मात्र असं असलं तरी देखील ठाकरे गटाला मात्र याचा मोठा फटका बसला.
40 आमदारांनी बंड केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची? यावरून वाद सुरू झाला. अखेर हा वाद थेट सुप्रीम कोर्टात देखील पोहचला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेत पडलेल्या फुटीला कोण जबाबदार? यावरून देखील वादंग सुरू आहे.
अशातच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केल असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. “शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार असल्याच आदित्य ठाकरेंनी म्हंटलं आहे. यामुळे आता ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे.
नुकतच एका कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीवरून खळबळजनक वक्तव्य केल आहे. “शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे. ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे. “आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील, असं आदित्य ठाकरेंनी म्हंटलं आहे. यावर अद्याप बंडखोर आमदारांनी वक्तव्य केलेलं नाहीये.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आमच्यात अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची बोलणी झाली होती. मात्र, भाजपाने ते आश्वासन पाळलं नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते. पण, आमचा तत्वांवर विश्वास आहे,” असे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज