Share

बदली थांबवण्यासाठी शिक्षकांनी ३० पेक्षा जास्त विद्यार्थीनींसोबत केले ‘हे’ कृत्य, पोलिसांनी अशी केली सुटका

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बेहजाम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या (KGBV) सुमारे दोन डझन विद्यार्थिनींना गुरुवारी रात्री त्यांच्या दोन शिक्षकांनी टेरेसवर कोंडून ठेवले होते. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. लखीमपूर खेरी मूलभूत शिक्षण अधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांनी शुक्रवारी पीटीआयला सांगितले की, शिक्षकांनी अनुशासनात्मक कारणास्तव म्हणजेच दुसऱ्या शाळेत करण्यात आलेल्या बदल्या रद्द करण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी अशा युक्त्या वापरल्या.(This act was done by the teacher with more than 30 students)

कस्तुरबा गांधी निवासी कन्या विद्यालयच्या वॉर्डन ललित कुमारी आणि पूर्णवेळ शिक्षक यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी रात्री शाळेच्या छतावरून 30 हून अधिक विद्यार्थिनींच्या ओरडण्याचा आवाज आला. शिक्षकांनी विद्यार्थिनींना टेरेसवर नेऊन बंदिस्त ठेवल्याचा आरोप वॉर्डन ललित कुमारीने केला आहे.

अहवालानुसार, वॉर्डनने घडामोडीची माहिती बीएसएला दिली, ते घाईघाईने शाळेत पोहोचले. पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिला पोलिसांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींना शाळेच्या टेरेसवरून बाहेर काढण्यात आले. डीसी गर्ल्स एज्युकेशनने शाळेतील दोन शिक्षकांविरुद्ध नीमगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

BSA डॉ. लक्ष्मीकांत पांडे यांनी विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले. ते म्हणाले की, कस्तुरबा गांधी निवासी कन्या विद्यालय, बेहजाम येथील घटनेची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, स्कूलमध्ये वॉर्डन आणि शिक्षकांमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. त्याच्या तक्रारी बीएसएपर्यंत पोहोचल्या. कारवाई करत बीएसएने शिक्षिका मनोरमा मिश्रा यांची पालिया येथे तर गोल्डी कटियार यांची रामियाबेहाड शाळेत बदली करण्यात आली.

घटनेच्या एक दिवस आधी दोन्ही शिक्षकांची बदली झाल्याचे सांगण्यात येत आहे. वादात अर्ध्या शाळकरी मुली वॉर्डनला तर अर्ध्या शिक्षकांना साथ देत होत्या. डीसी गर्ल्स एज्युकेशनने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्यात दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थिनींना बंदिस्त ठेवल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणाची चार सदस्यीय समितीमार्फत विभागीय चौकशी केली जाणार आहे. समितीला तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तपासात दोषी आढळल्यास सेवा करार रद्द करण्यासह शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

ताज्या बातम्या शिक्षण

Join WhatsApp

Join Now