Share

‘RRR बनवल्याबद्दल त्यांनी ६ महिने तुरूंगवास भोगावा’, अभिनेत्याने राजामौलींची उडवली खिल्ली

साऊथचे सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांचा चित्रपट आरआरआर (RRR) अखेर चित्रपटगृहात पोहोचला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीला येणारे ट्विट प्रेक्षकांना चित्रपट खूप आवडल्याचे सांगत आहेत. मात्र, माजी बिग बॉस स्पर्धक आणि YouTuber कमाल आर खान उर्फ ​​केआरकेने चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. त्याने ट्विटरवर दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाची इज्जत काढली आणि त्यांनी 6 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा, असेही म्हटले.(They should suffer 6 months prisoner for making RRR)

https://twitter.com/kamaalrkhan/status/1507056559783874575?s=20&t=7VwW5Wevpv8FgCqecLDVOg

बॉलीवूड अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान यांनी या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तत्पूर्वी त्याने ट्विट केले होते की, मी ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होतो तो मी पाहत आहे. मी इंटरवलमध्ये रिव्यू देईल. मग काय, चित्रपटाचा इंटरवल होताच केआरकेच्या ट्विटरवर ट्विट येऊ लागले.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1507092591409610758?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1507092591409610758%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.bollywoodlife.com%2Fhi%2Fsouth-gossip%2Frrr-movie-review-krk-slams-ss-rajamouli-says-he-should-be-jailed-for-the-film-south-movie-actor-gossips-and-news-2034462%2F

आरआरआर चित्रपट पाहिल्यानंतर कमाल आर खानने अनेक ट्विटमध्ये लिहिले, ‘आरआरआर हा चित्रपट पूर्णपणे दक्षिणेचा चित्रपट आहे, डोक आणि पाय नसलेला आहे.’ यानंतर केआरकेने कमेंट करत लिहिले, आरआरआर हा भारतीय इतिहासातील सर्वात हास्यास्पद चित्रपट आहे. जे यापूर्वी कधीही झाले नव्हते. हा चित्रपट माणसाला मारण्यासाठी मेंदूतील पेशी नष्ट करतो. भारतात बनलेला हा सर्वात वाईट चित्रपट आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1507101246678839296?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1507101246678839296%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.bollywoodlife.com%2Fhi%2Fsouth-gossip%2Frrr-movie-review-krk-slams-ss-rajamouli-says-he-should-be-jailed-for-the-film-south-movie-actor-gossips-and-news-2034462%2F

या चित्रपटाच्या तुलनेत ठग्स ऑफ हिंदोस्तान, मुघल-ए-आझम आहे. माझ्याकडून या चित्रपटाला झिरो स्टार्स. आणखी एका ट्विटमध्ये कमाल आर खान यांनी लिहिले की, मी याला चूक म्हणू शकत नाही. हा गुन्हा आहे. हा मूर्खपणाचा चित्रपट बनवल्याबद्दल दिग्दर्शक राजामौली यांना 6 महिने तुरुंगात पाठवावे. ज्याचे बजेट 600 कोटी आहे.

यावर NK ने लिहिले, “रडू नकोस… तुला फुकटात चित्रपट बघायचा होता ना, मी तुमच्या तिकिटाचे 500 रुपये देईन. आनंदी रहा. नकारात्मकता पसरवत रहा…शक्य असल्यास कृपया एक छोटा चित्रपट दिग्दर्शित करा. नाहीतर सगळे तुला जन्मभर तुरुंगात टाकतील.” अभिजीत बुलबुले यांनी लिहिले, पैसे मिळाले नाहीत का? भाऊ कृपया योग्य रिव्ह्यू द्या. राधेश्यामचा रिव्यू इतका छान दिला की आजपर्यंत पोटात दुखतंय.

कमाल आर खानला हा चित्रपट आवडला नसावा. मात्र सर्वसामान्य प्रेक्षक या चित्रपटाचे भरभरून कौतुक करताना दिसतात. समोर येत असलेल्या ताज्या ट्विटमध्ये, सिने प्रेक्षकांनी दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या या चित्रपटाचे कौतुक केले आहे. सुरुवातीच्या पातळीवर चित्रपटाला मिळालेल्या या कौतुकांमुळे पुढे चांगला व्यवसाय करण्यास मदत होईल.

महत्वाच्या बातम्या-
सलमान खानचा आणखी एक कांड उघड, कोर्टाच्या आदेशानंतर भाईजानच्या अडचणी वाढल्या
भारताची साथ सोडणं पडलं महागात, चीनच्या सापळ्यात अडकून श्रीलंकेची झाली वाईट अवस्था
इतक्या वर्षांनंतर मुमताजने धर्मेंद्रला दिलं अनोखं सरप्राईज, धर्मेंद्रही झाले खुश, पत्नीने केलं जंगी स्वागत
रिलीजपुर्वीच नोट छापणारी मशीन बनला राजामौली यांचा RRR चित्रपट; तब्बल इतक्या कोटींची केली कमाई

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now