मध्य प्रदेशातील देवासमध्ये पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांवरून पतीने निर्दयतेची सीमा ओलांडली. सुरुवातीला त्याने पत्नीला बेदम मारहाण केली, तिचे केस ओढले, तिला जमिनीवरही फरफटले. यावर त्यांचे समाधान झाले नाही तर स्वतः पत्नीच्या खांद्यावर बसून गावभर मिरवणूक काढली. तसेच पत्नीला चपलांचा हारही घातला.(Madhya Pradesh, extramarital affairs, Suryakant Sharma, boyfriend)
महिलेला तीन मुले आहेत. गेल्या एक आठवड्यापासून ती तिच्या पुरुष मित्रासोबत राहत होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. देवासचे अतिरिक्त एसपी सूर्यकांत शर्मा यांनी सांगितले की, तिच्या पतीसह ११ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
देवास जिल्ह्यातील पुंजापुरा येथील बोरपाडाव गावात एक दिवसापूर्वी ही घटना घडली होती. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. आठवडाभरापूर्वी ही महिला घरातून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. पती आणि सासरच्यांनी तिचा खूप शोध घेतला. न सापडल्याने उदयनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
रविवारी पतीने पत्नी गावातच प्रियकराच्या घरी असल्याची माहिती दिली. यानंतर पती आणि सासरचे लोक तिला शोधत प्रियकराच्या घरी पोहोचले. तेथे महिला पेटीत लपलेली आढळून आली. आरोपींनी तिला बाहेर काढून गावासमोर बेदम मारहाण केली. एक-दोन लोक वगळता बहुतेक लोक प्रेक्षक म्हणून आले होते.
पोलिसांनी आता महिलेला तिच्या माहेरी पाठवले आहे. या महिलेचे वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी लग्न झाले होते. ३० वर्षीय महिलेला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी १३ वर्षांची आणि धाकटी १० वर्षांची आहे. मुलगा ८ वर्षांचा आहे. असे सांगितले जात आहे की काही दिवसांपूर्वी मुलांनी त्यांच्या आईला तिच्या प्रियकरासोबत पाहिले होते. हा प्रकार त्यांनी वडिलांना सांगितला. यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानंतरच ही महिला घरातून निघून गेली.
उदयनगर पोलिसांनी आरोपी मुकेश, चिताराम, राहुल, नानुराम, गब्बर, बाळू, भोलिया, धर्मेंद्र, करण आणि छोटू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व बोर पाड्यातील रहिवासी आहेत. ग्रामीण एएसपी सूर्यकांत शर्मा यांनी सांगितले की, इतर अज्ञातांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे.
या घटनेवरून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्य सरकारला घेरले आहे. ते म्हणाले- शिवराजजी, मला तुम्हाला विचारायचे आहे की, राज्यात आदिवासी महिलांवर असे रानटी अत्याचार का होत आहेत? शेवटी तुम्ही घोषणा देत राहण्याचे आणि आदिवासी महिलांवरील अत्याचार वाढतच राहण्याचे कारण काय? हे काही पहिले प्रकरण नाही.
ते पुढे म्हणाले, तुमच्या सरकारच्या आश्रयाने राज्यातील आदिवासींवर इतके अत्याचार होत आहेत, यावर आता मध्य प्रदेशातील जनतेने विश्वास ठेवावा का? तुम्ही आदिवासींच्या नावावर नौटंकी करत राहता आणि आदिवासींची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. माझ्या आदिवासी बंधू-भगिनींच्या अवस्थेची मला लाज वाटते, तुम्हालाही लाज वाटते का?
महत्वाच्या बातम्या-
सॅल्युट! सॉफ्टवेअरची नोकरी सोडून आदिवासी शेतकऱ्यांना केली मदत, तीन पटीने वाढवले त्यांचे उत्पन्न
प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयात केले दाखल; मुलाने दिली ‘ही’ महत्वाची अपडेट
भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा; कोण आहेत द्रौपदी मुर्मू? जाणून घ्या..
प्रकाश आमटेंच्या प्रकृतीबाबत मुलाने दिली महत्वाची अपडेट, म्हणाला, बाबांची प्रकृती आज