Share

aditya thackeray : ठाकरे गटाची प्रतिज्ञापत्रे खरंच बाद झाली? आदित्य ठाकरेंनी केला मोठा खुलासा, म्हणाले…

aditya thackeray

aditya thackeray : सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेत खळबळ उडाली आहे. अशातच काल एक बातमी समोर आली अन् ठाकरे गटाला धक्का बसला. ती बातमी म्हणजे, निवडणूक आयोगाने एक मोठी माहिती दिली आहे.

ठाकरे आयोगाला पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याने निरुपयोगी ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. खरी शिवसेना कोणाची..? यावरून सध्या ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाने 11 लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे शिवसैनिकांकडून जमा करून दिली. मात्र फॉरमॅट चुकल्याने अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी झाल्याच वृत्त समोर आलं आहे. अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी ठरली असली तरी देखील 8.5 लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा करण्यात ठाकरे गटाला मोठं यश आलं आहे.

मात्र एवढ यश मिळून देखील पदरी निशाणाच आल्याच आता पाहायला मिळत आहे. कारण, निवडणूक आयोगाने एक मोठी माहिती दिली आहे. यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर खुद्द माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत संभ्रम वाढविला आहे.

पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रतिज्ञापत्रांबाबत विचारले असता तेव्हा ते म्हणाले की, प्रतिज्ञापत्रे बाद झाल्याची बातमी खोटी आहे. त्या बातमीच्या सोर्सवर विश्वास ठेवू नका, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं. आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून नेमकी खरी गोष्ट काय? याबाबत संभ्रम वाढला आहे.

दरम्यान, या प्रकरणावर अद्याप ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र आता यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येतीये? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार. सध्या तरी आदित्य ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रे बाद झाल्याची बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर
‘या’ छोट्याश्या चुकीमुळे सायरस मिस्त्रींनी गमावला जीव? अन्यथा आज ते आपल्यात असते, वाचा नेमकं काय घडलं?
पुण्यात डुप्लिकेट मुख्यमंत्र्याची हवा; मंडळांकडून मिळतायत आरतीचे आमंत्रणे, फोटो पाहून थक्क व्हा
Virat Kohali: पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर विराट-अनुष्का झाले इतके नॉटी, जीभ बाहेर काढून एकमेकांसोबत करू लागले..

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now