पावसाळी अधिवेशन(Monsoon sessions): राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनात शिवसेना आमदार आदित्य ठाकरेदेखील सहभागी झाले होते. आदित्य ठाकरेंनी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, जे गद्दार सोबत गेले त्यांचा गेम कसा केला हे सर्वांनाच दिसत आहे.
पुढे आदित्य म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तारात खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळलं आहे. अपक्षांना, महिलांना काही स्थान देण्यात आलेलं नाही. मुंबईकरांनाही काही स्थान देण्यात आलेलं नाही. सर्वात प्रथम जाणारे १४-१५ जण जे निष्ठावंत होते, त्यांनाही स्थान दिलं नाही. निष्ठेला मनात स्थान नाही हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. ज्या निष्ठावंतांना स्थान दिलं आहे त्यांनाही कमी लेखलं आहे. आमच्याकडे बरे होते असं झालं आहे. तिथे जाऊन ते अडकले आहेत, नजरकैदेत आहेत.
दरवाजे अद्यापही खुले आहेत. पण..
आदित्य ठाकरे बंडखोरांविषयी बोलताना म्हणाले, आता आमच्यासाठी दरवाजे खुले आहेत का असं त्यांना वाटत असेल. त्यांना मी सांगू इच्छितो, दरवाजे अद्यापही खुले आहेत. पण ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी आमदाराकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं.
हे सरकार घटनाबाह्य..
“ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्याविरोधात आम्ही उभे असून, हे गद्दार सरकार असून कोसळणारच,” हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार असून नक्की कोसळणार असंही आदित्य म्हणाले.
माध्यमांनी आदित्य ठाकरेंना विचारले की, बिहारमध्ये जे नितीश कुमार यांना जमलं, ते उद्धव ठाकरेंना का जमलं नाही? त्यावर आदित्य म्हणाले “२०१९ मध्ये आम्ही देशाला पर्याय दिला होता. दुर्दैवाने आमच्यातूनच काही विश्वासघात करणारे गद्दार बाहेर पडले, ज्यांनी एका प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसला. सगळं काही देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणं ही महाराष्ट्राची, देशाची संस्कृती नाही. हे घाणेरडं राजकारण असून आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
महत्वाच्या बातम्या
विनायक मेटेंच्या पत्नीला राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी द्यावी; राष्ट्रवादीची मागणी
Bollywood: आता बाॅलीवूडवरही ईडीची काडी; अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस २०० कोटींच्या घोटाळ्यात आरोपी
भाजपला शिंदे गटाची गरज नाही?, प्लॅन बी वर काम सुरू; राजकीय वर्तूळात खळबळ
Kerala : महिलेचे कपडे उत्तेजित करणारे असल्याने लैंगिक छळाचा गुन्हा होऊ शकत नाही ; केरळमधील कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय






