ऋतुराजचे राज! गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत १२ चेंडूत ठोकल्या ६० धावा; पाहा धडाकेबाज खेळी

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने  चेन्नई सुपर किंग्सच्या  नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवली होती. पण, धोनीचा हा निर्णय फसलेला दिसला. गतविजेत्या चेन्नईला ८ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवता आले आणि जडेजाला कर्णधारपदाचा भार झेपत नसल्याचे दिसले. त्यामुळे धोनीच प्रत्यक्ष मैदानावर नेतृत्व करताना दिसला. रवींद्र जडेजाने अखेर चेन्नईचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने ही जबाबदारी … Read more

‘वा राजसाहेब वा! आज आम्ही सुखावलो, बऱ्याच काळाने मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे..;

शरद पोंक्षे हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात. नाट्यसृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका यशस्वीरित्या साकारणारे अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यामुळे त्यांना मानणारा एक वेगळा … Read more

“मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी गळ्यात हिरवा साप बांधण्यापेक्षा भगवी शाल महत्वाची”

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेची गेल्या १० दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. कल संध्याकाळी झालेल्या या सभेत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच भुजबळ आणि मिटकरींवर देखील  तीव्र शब्दांत  निशाणा  साधला आहे. काय म्हणाले प्रकाश महाजन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी गळ्यात हिरवा साप बांधण्यापेक्षा भगवी शाल ही महत्त्वाची आहे, अशा शब्दांत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी … Read more

तुमच्या दुर्गेला विवस्र नाचायला कुणी भाग पाडलं? त्यावेळी तिला वाचवलं कुणी? वादग्रस्त विधाने सुरूच

पंजाबच्या पतियाळामध्ये शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकामध्ये धुमश्चक्री झाली आहे. खलिस्तान दिवस साजरा करण्यावरुन दोन्ही गट आमने सामने आले. २९ एप्रिलला खालिस्तान दिवस साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यामुळे पतियाळात ‘खलिस्तान मार्च‘च आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शिवसैनिक व शीख संघटना आमने-सामने आल्यामुळे मोर्चादरम्यान दोन गटांत संघर्ष उफाळून आला . एक गट मोर्चा काढण्याच्या … Read more

जेष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा

मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं आज १ मे रोजी  पहाटे  ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबई येथे घेतला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९८० ते २०००  च्या दशकात प्रेमा किरण यांनी  अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर, अर्जुन देवा, अशा अनेक चित्रपटांमध्ये … Read more

खूपच हलाखीत काढत होता दिवस, पण ती व्यक्ती आयुष्यात आली अन् बदलले हिटमॅनचे दिवस

टीम इंडियाचा कर्णधार  रोहित शर्मा आज ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी नागपूर येथे झाला. क्रिकेट विश्वात हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहितने वनडेमध्ये ३ वेळा द्विशतक केले आहे, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या देखील त्याच्या नावावर आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी… … Read more

देशात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार? अमित शहांचे स्पष्ट संकेत

समान नागरी कायद्याचा वाद भारतात अनेक वर्षांपासून चालत आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात लवकरच समान नागरी कायदा  लागू होऊ शकतो, असे संकेत दिलेत. भोपाळमध्ये भाजप नेत्यांच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की, सीएए, राम मंदिर, कलम ३७० आणि ट्रिपल तलाक यांसारख्या मुद्द्यांवर निर्णय झालाय. आता समान नागरी कायद्याची वेळ आलीय. अयोध्येत राम मंदिर , काश्मीरला – विशेष … Read more

प्रसाद ओकला आनंद दिघेंच्या रुपात पाहून बहिण अरूणा यांना अश्रू अनावर, शब्दही फुटेना

लोकांचा नेता,अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या टिझरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेले व्यक्तिमत्व. तसेच ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे व्यक्ती म्हणजे धर्मवीर. दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सांगणारा “धर्मवीर: मुक्काम पोस्ट … Read more

ठाकरे आक्रमक! भाजप आणि मनसेवर तुटून पडा; मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आदेश

गेल्या काही दिवसांपासून  राणा, किरीट सोमय्या हल्ला प्रकरण संपत नाही. तोच आता राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. ३ मे रोजी मशीदींवरील भोंग्यांवरून आव्हान दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. राज्यातील राजकीय स्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज  सेनेची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.शिवसेना खासदारांच्या शिवसंपर्क … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! किसान सन्मान निधीच्या २ हजारांसोबत आता ३ लाखांची मदत सुद्धा मिळणार

पंतप्रधान किसान सन्मान योजना ही कृषी क्षेत्रातील सर्वात मोठी योजना मानली जाते.केंद्र सरकारने २०१९ मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. ही केंद्र सरकार’द्वारे चालविण्यात येणारी योजना आहे. शेतकऱ्यांमध्ये या योजनेविषयी मोठ्या प्रमाणात  लोकप्रियता  आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर ४ महिन्यांच्या अंतरानं २ हजार रुपयांचा हप्ता, … Read more