Share

विवेक अग्निहोत्रींच्या दिल्ली फाईल्सवर भडकले शीख, म्हणाले, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर..

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) नुकतेच त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि त्यांच्या विस्थापनावर बनलेला हा चित्रपट चांगलाच पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर विवेक अग्निहोत्रीने घोषणा केली होती की, ते आता दिल्लीतील 1984 च्या शीखविरोधी दंगलीवर आपला पुढचा चित्रपट ‘द दिल्ली फाइल्स’ बनवणार आहे. विवेकच्या या घोषणेवर महाराष्ट्रातील एका शीख संघटनेने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.(Sikhs angry over Vivek Agnihotri’s Delhi files)

सोमवारी महाराष्ट्र शीख असोसिएशनने म्हटले आहे की, चित्रपट निर्मात्यांनी समाजातील अस्वस्थ शांतता भंग करण्यापासून दूर राहावे. तथापि, विवेक अग्निहोत्री यांनी अद्याप पुष्टी केलेली नाही की ते दिल्ली फाइल्समध्ये 1984 शीखविरोधी दंगल दाखवतील की नाही. आपल्या प्रसिद्धीपत्रकात, असोसिएशनने म्हटले आहे की, वैयक्तिक फायद्याच्या आणि सर्जनशीलतेच्या नावाखाली लोकांनी शीख दंगलीसारख्या मानवतेच्या शोकांतिकेने भरलेल्या दुर्दैवी घटनेचा व्यावसायिक वापर करू नये.

या मुद्द्यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले की, ती कोणती संघटना आहे याची मला कल्पना नाही. मी एक भारतीय आहे आणि मी एका स्वतंत्र देशात राहतो जो मला हवे तसे माझे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. जे बनवायचे ते मी बनवीन. माझा आत्मा जे काही म्हणेल ते मी करीन. मी कोणत्याही संघटनेचा गुलाम नाही. मी अजून काय बनवणार आहे हे देखील सांगितले नाही. लोक अंदाज लावत आहेत आणि त्यांना अंदाज लावू द्या. पण मी बनवत असलेल्या चित्रपटाला परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय सेन्सॉर बोर्ड घेईल.

त्याच्या प्रकाशनात शीख संघटनेने म्हटले आहे की, समाजात आधीच ध्रुवीकरण आणि समुदायांमध्ये द्वेष आहे. अशा स्थितीत वैयक्तिक फायद्यासाठी इतिहासातील दुर्दैवी घटनांना ज्वलंतपणे दाखविल्यास लोकांच्या भावना आणखी भडकतील आणि अस्वस्थ होईल. भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे आणि विविध धर्माचे लोक शांतता आणि सौहार्दाने जगण्याचा प्रयत्न करत आहेत. शीख समाज हा काळा अध्याय विसरून पुढे गेला आहे.

संघटनेने पुढे म्हटले आहे की, कालांतराने शीख समाजाच्या जखमा हळूहळू भरून येत आहेत. या दुर्दैवी घटनेतील बहुतांश दोषी एकतर मृत किंवा तुरुंगात आहेत. न्याय उशिरा आला पण आला आहे. त्या दंगलीबद्दल सरकारने संसदेत माफीही मागितली आहे. दंगलीतील हत्या केवळ स्वत:च्या फायद्यासाठी दाखवून नव्या पिढीच्या मनात विष पेरून त्यांच्यात रक्ताच्या उकळ्या फुटतील ज्यामुळे लोकांमध्ये द्वेष पसरेल. समाजात अशांतता निर्माण व्हावी यासाठी जाणीवपूर्वक जखमा करण्याचा हा प्रयत्न आहे. ते योग्यही नाही आणि नैतिकही नाही. राष्ट्रीय एकात्मता दाखवण्यासाठी आणि समाजात एकोपा आणण्यासाठी चित्रपट बनवले पाहिजेत.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, विवेक अग्निहोत्रीवर ‘द कश्मीर फाइल्स’साठी अनेकांनी टीका केली आहे. विविध राजकीय संघटना आणि सेलिब्रिटींनी विवेकवर एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला प्रोत्साहन, मुस्लिमांबद्दल समाजात द्वेष पसरवण्याचा आणि जातीयवादाने प्रेरित चित्रपट बनवल्याचा आरोप केला होता. मात्र, विवेकने स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्याचा चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात नाही.

महत्वाच्या बातम्या-
कोणत्या घटनेवर बनवणार द दिल्ली फाईल्स? चित्रपटात काय होणार? विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा
विवेक अग्निहोत्रींवर या कारणामुळे भडकले शीख लोकं, म्हणाले, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका 
पंडितांनो, काश्मिर सोडा नाहीतर मारले जाल, अग्निहोत्रींनी शेअर केले धक्कादायक पत्र, म्हणाले
द काश्मिर फाईल्सची टीम पुन्हा एकत्र, विवेक अग्निहोत्री दोन चित्रपटांतून बाहेर आणणार काळे सत्य

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now