Share

शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात ठोकला शड्डू; स्वत: उतरले मैदानात उतरले

सत्तेत असून देखील एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड शिवसेनेसाठी मोठी डोळेदुखी ठरली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अख्खं महाविकास आघाडी सरकार सत्तेतून खाली आलं. शिंदे यांच्या बंडाचे हादरे थेट शिवसेनेच्या मुळाशी गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं.

यासर्व राजकीय घडामोडींवर मात्र राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोणतीही ठोक भूमिका घेतली नसल्याच दिसून आलं. अख्खं महाविकास आघाडी सत्तेतून गेलं मात्र शरद पवार हे शांतच होते. कोणतेही मोठं व्यक्तव्य शरद पवारांनी केलं नाही.

मात्र आता विरोधकांच्या गोटात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अशातच शरद पवार यांनी पुन्हा राज्याच्या राजकारणात जातीने लक्ष घातले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शरद पवार हे जातीने कामाला लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी स्वत: चर्चा करणार आहेत.

विशेष बाब म्हणजे बाब म्हणजे शरद पवार याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून करणार आहे. शरद पवारांनी शिंदे सरकारला चारी मुंड्या चीत करण्यासाठी मास्टर प्लान आखलेला दिसत आहे. यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, आज शरद पवार हे ठाणे दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी शरद पवार पोहोचले असल्याची देखील माहिती मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

काही दिवसांपूर्वीच डावखरे, गणेश नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शरद पवारांकडून आता आव्हाड यांना बळ दिलं जात असल्याच राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे.  दरम्यान, शरद पवार ठाण्यात जाऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कोणता सल्ला देतात? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now