Share

‘किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय म्हणजे सर्वनाशाकडे टाकलेले पाऊल’

udhav thackeray

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने  हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं.

मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपाकडून कडाडून विरोध दर्शविला आहे. तसेच श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘वाईनला परवानगी देण्याचा निर्णय हा संतापजनक,’ असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. (sambhaji bhide criticizes thackeray gov)

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘सरकारने वाइन सुरू करून जुगार लावलेला आहे. मला आर आर आबांची आठवण होते. आज ते असते तर हा वाईनचा निर्णय झाला नसता. तसेच सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी डान्सबार बंदी करण्याचा निर्णय घेतला होता असेही भिडे म्हणाले.

दरम्यान, ‘महाराष्ट्राने संपूर्ण देशाला देशपण आणि भवितव्य दिले आहे. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्या सरकारविरोधात सर्व संघटनांनी आता लढा उभारला पाहिजे. यासाठी मंत्रिमंडळाशी बोलून हा निर्णय मागे घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. अन्यथा राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचेही भिडे म्हणाले.

राज्य सरकारच्या या निर्णयावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईने कडाडून विरोध केला आहे. त्या म्हणाल्या, ‘या सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली आणि आता सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार. यांना तरुणांचे भविष्य घडवायचे आहे की अंधारात ठेवायचे? असा संतप्त सवाल देसाई यांनी उपस्थित केला.

तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक तरूण गैरमार्गाला लागले आहेत ,गुन्हे वाढत आहेत त्यात असा निर्णय घेणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे सरकार जनतेचे आहे की दारुड्यांचे, हे एकदा महाविकास आघाडी सरकारने सांगावे, असे म्हणत देसाई यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
बेरोजगारीमुळे देशातील परीस्थीती बिकट, त्यापासून दूर जाणे म्हणजे कापसाने आग विझवणे; भाजप खासदाराचा मोदींना घरचा आहेर
..त्यावेळी रवीना टंडनने फराह खानला खुल्लेआम दिली होती धमकी, कारण वाचून अवाक व्हाल
ओमिक्रॉननंतर आता निओकोव्हची भिती, प्रत्येक तीनपैकी एकाचा होऊ शकतो मृत्यु; वुहानच्या शास्त्रज्ञांचा दावा
आता खुप उशीर झालाय, पण…; रोहित-द्रविडच्या जोडीवर मास्टर ब्लास्टर सचिनचे मोठे वक्तव्य

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now