यशचा KGF Chapter 2 लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये आतापासूनच चर्चा रंगली आहे. ‘रॉकी’ ची पुढील कथा जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. असो, रॉकी कोलार गोल्ड फिल्ड्स (KGF) मध्ये कैद झालेल्या सर्व निरपराध लोकांना कसे मुक्त करतो हे पाहणे मनोरंजक असेल.(read-how-yash-bodyguards-become-dangerous-villains)
सध्या, आपल्याला ‘गरुड’ उर्फ रामचंद्र राजू माहित आहे, जो चित्रपटाच्या पहिल्या भागात भयानक खलनायक बनला होता. ज्याने साउथ इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. KGF माफिया सूर्यवर्धनचा मुलगा गरुड बनलेल्या रामचंद्र राजूने 2018 मध्ये KGF Chapter-1 मध्ये पदार्पण केले आणि पहिल्या चित्रपटातच अशी अप्रतिम भूमिका केली, त्यानंतर त्याच्या नावाची भीती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.
रामचंद्र राजू:
रामचंद्र राजू अभिनय कारकिर्दीत सामील होण्यापूर्वी, चित्रपटात रॉकी बनलेला यशचा अंगरक्षक होता. पण चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेला पाहिल्यानंतर याचा अंदाज लावता येत नाही की, त्याचं कोणतही फिल्मी बैकग्राउंड नाही.
रामचंद्र राजू यांनी ‘सुलतान’, ‘मधगजा’, ‘वेत्री’, ‘जन गन मन’ आणि ‘बंपर’ यांसारख्या साऊथच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. रामचंद्र राजू यांनी आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की ते कधी चित्रपट करतील आणि इतके लोकप्रिय होतील.
‘केजीएफ’चे दिग्दर्शक आणि लेखक प्रशांत नील यांच्या प्रेमामुळे ते इथपर्यंत पोहचले. ज्यांनी यशसोबत KGF च्या स्क्रिप्टवर चर्चा केली होती आणि त्याच दरम्यान त्यांना रामचंद्र राजू दिसले. यानंतर त्याला गरुडाच्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यास सांगितले. दिग्दर्शकाने रामचंद्र राजू यांना दाढी वाढवण्यास सांगितले, ज्याला रामचंद्र सहमत झाले आणि त्यांनी अभिनय करण्यास सहमती दर्शवली.
त्यानंतर बराच वेळ काहीही झाले नाही. प्रकरण अंगलट आले. रामचंद्र यांच्याकडून दिग्दर्शकाचा नंबरही हरवला होता. मात्र अनेक महिने उलटल्यानंतर त्यांना ऑडिशन देण्यास सांगण्यात आले. ऑडिशन दिल्यानंतर गरुडाच्या पात्रासाठी त्यांना पसंती मिळाली. मात्र, चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे की, त्यांना या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये ‘गरुड’ पाहायला मिळणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
देवदूत! भर युद्धात 2424 किमी बाईक चालवत पोहोचला आणि लोकांपर्यंत पोहोचवल्या आवश्यक वस्तू, औषधे
रशिया-युक्रेन युद्धात आता सोनम कपूरची उडी; म्हणाली, या युद्धात भारतीय लोकांना दोन्ही बाजूंनी..
..त्यामुळे साताऱ्यातील आपशिंगे गावाला मिलिटरीने थेट रणगाडाच दिला भेट, गावात जल्लोषाचे वातावरण
मणिपूर आणि गोव्यात कोणाचे सरकार येणार? एबीपी न्यूज-सी वोटर ओपिनीयन पोलमधून झाला खुलासा