पहिल्यापासून नाणारमध्ये होत असलेल्या रिफायनरीला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता, यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारला नाणारऐवजी राजापूरच्या बारसू, सोलगावमध्ये रिफायनरीसाठी जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता.
तर आता शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून पुन्हा रिफायनरी प्रकल्प चर्चेत आला आहे. बारसू, सोलगाव इथं रिफायनरी उभारणीला स्थानिक शिवसेना आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी समर्थन केल्यामुळे शिवसेना नेतृत्व नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साळवी यांनी घेतलेल्या समर्थनाच्या भूमिकेवरून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. याचबरोबर साळवी यांनी राजापूरच्या रिफायनरीच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलावून आणि खडसावल्याची देखील माहिती मिळत आहे.
दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी रिफायनरीला विरोध केल्यास आमदार राजन साळवी वेगळी राजकीय भूमिका घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आता यावरून शिवसेनेतील नाराजीनाट्य समोर आलं आहे. साळवींचं रिफायनरीला समर्थन हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याची शिवसेना नेत्यांनी म्हंटलं आहे.
मात्र भास्कर जाधवांना शिवसेना नेतेपद दिल्यामुळे साळवी नाराज आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे आता राजन साळवी यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साळवी यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
PHOTO: साऊथच्या दिपीका पदुकोणने बेडरूममध्ये दिली किलर पोज, फोटो पाहून नेटकरी घायाळ
धक्कादायक; लिंगायत संतांचा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आंदोलन पेटलं
T.V. Star: ‘या’ अभिनेत्रीला होते सेक्सचे व्यसन, ७०० पुरूषांसोबत बनवले संबंध, स्वत:च खुलासा करत म्हणाली..
Prime Minister: ‘तो’ शब्द ऋषी सुनक यांना पडलं महागात, पंतप्रधान शर्यतीत पडले मागे, आपल्याच पायावर मारली कुऱ्हाड