राज्यात आगामी मुंबई महानगर पालिका निदवणुकीच्या तोंडावर राजिय वातावरण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर अलीकडच्या काही दिवसांमध्ये मनसेच्या गोटात देखील हालचालींना वेग आला होता. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
याचे कारण असे की, अलीकडे भाजप नेते आणि शिंदे गटातील नेते हे सतत राज ठाकरेंच्या भेटीसाठी जातं होते. यामुळे भाजप – मनसेच्या युतीचे स्पष्ट संकेत दिसतं होते. याचबरोबर राज ठाकरे यांनी डबे जोडण्याचं काम सुरू झालंय असं विधान केलं होतं. त्यामुळे या तिन्ही पक्षांची युती होणार असल्याचं सांगितलं जात होतं.
मात्र अशातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मनसेने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. यामुळे आता भाजप – शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.
याचबरोबर देशपांडे यांनी सांगितलं आहे की, आगामी सर्व पालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार आहे. मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मुंबईत सर्व जागांवर मनसेचे उमेदवार उभा करण्यात येणार आहेत. मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभा करणार आहे.
मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजप युती तुटली खरं..! मात्र आता मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मराठी मतांची जागा भाजप कशी भरणार? असा सवाल उपस्थित झालाय. यामुळेच भाजप मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातं जातं. मात्र आता मनसेने युती करण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, मनसे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील सर्वच मुख्य महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची चिन्हं आहेत. कारण आम्ही सर्वच महापालिका निवडणुकीत आमची ताकद आजमावणार आहोत, असं देशमुख सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के..! माजी आमदारासह तब्बल ५० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
Bachchu Kadu : बच्चू कडूंना राडा भोवला; कोर्टाने केली थेट कोठडीत रवाणगी, आता खावी लागेल जेलची हवा
Jayant Patil : महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?
स्कुल बसचालकाचा चिमुकलीवर बलात्कार, २४ तासांत आरोपीच्या राहत्या घरावर बुलडोझर!