उत्तर प्रदेशमध्ये, योगी सरकारचे पशुधन, दूध विकास आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री, धरमपाल सिंह यांनी म्हटले आहे की वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्यासाठी बुलडोझर चालवला जाईल. त्याचबरोबर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याच्या मालमत्तांचीही माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी मदरशाबद्दल बरेच काही सांगितले आहे. राज्यात फक्त तेच मदरसे चालतील, ज्यामध्ये दहशतवाद शिकवला जात नाही, असे त्यांनी म्हटले आहे.(made-a-big-statement-about-madrasas-too-minister-of-yogis)
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धरमपाल सिंह म्हणाले, वक्फ बोर्डाच्या जमिनीवर माफियांचा कब्जा आहे. त्याला मुक्त करण्यासाठी आम्ही काम करू. बुलडोझरही चालवू. मदरशांच्या संदर्भात ते म्हणाले, मदरशांमध्ये कोणीतरी राष्ट्रीय शिक्षण देईल, राष्ट्रहितावर बोलेल. दहशतवाद शिकवला जाणार नाही. जर कॉमर्शियल शिक्षण दिले तर आम्ही त्याचा विचार करू.
आता येथे तंत्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील विद्यार्थ्यांना देशभक्ती आणि राष्ट्रवाद शिकवला जाणार आहे. धर्मपाल सिंह पुढे म्हणाले की, गायीसोबतच अल्पसंख्याक लोकांची देखील चिंता करावी लागेल. दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ते म्हणाले, काय विडंबन आहे की आता आपल्याला गायींचे रक्षण करावे लागेल आणि अल्पसंख्याक लोकांची काळजी घ्यावी लागेल. दोन्ही विरुद्ध विभाग आहेत.
धरमपाल सिंह गायींबद्दल म्हणाले, उत्तर प्रदेशातील शेतकरी आणि रस्त्यावर चालणारा सामान्य माणूस अस्वस्थ आहे. दोघांनाही समस्या आहेत. गायींचा प्रश्न असा आहे की, त्या शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या नाहीत तर त्यांनी जायचे कुठे? शेतकऱ्यापुढील प्रश्न असा आहे की त्यांनी आपल्या शेताची काळजी घेतली नाही तर त्याची मुले काय खातील? या दोघांची समस्या सोडवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
धरमपाल सिंह पुढे म्हणाले, प्रथम आम्ही गायींच्या संरक्षणासाठी जागा देऊ. प्रत्येक न्याय पंचायत स्तरावर गोशाळा बांधल्या जातील. यामध्ये गायींना मोकळे सोडले जाणार नाही. त्यांना खुंटीने बांधून ठेवले जाईल. यामध्ये चांगल्या जातीच्या गायीही वाढवल्या जातील. प्रत्येक गोठा स्वत:च्या संसाधनातून चालवण्याचा आमचा प्रयत्न राहील.
महत्वाच्या बातम्या-
लवकरच अंकिता लोखंडेच्या घरीही हालणार पाळणा? लॉकअपमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली..
हत्या करून मृतदेह लोखंडी पाईपला लटकावला; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं!
सोशल मिडीयावर व्हायरल झालेले हे फोटो पाहून २२ कोटी श्रीलंकन नागरिक संतापले, दिल्या अशा प्रतिक्रिया
कोल्हापूरमध्ये प्रचार करत असताना अज्ञात व्यक्तीने माझा पाठलाग केला, मी ज्या ज्या ठिकाणी सभा घेते त्या ठिकाणी