Share

Sanjay Shirsat :’या’ कारणामुळेच आम्ही पक्ष सोडला; याकूब मेनन प्रकरणी संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर मेननचा मृतदेह दक्षिण मुंबईतील एका मोठ्या स्मशानभूमीत पुरण्यात आला. मात्र, आता काही धक्कादायक फोटो समोर आले असून यामध्ये याकुब मेनन याच्या समाधीवर एलईडी लायटिंग आणि मार्बल टाइल्स लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.

हे फोटो समोर येताच आता राजकीय वर्तुळात देखील विरोधक सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मेनन याचं कबरीचं समाधीत रूपांतर केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

शिरसाट म्हणाले, ज्याने बॉम्बस्फोट घडवले, ज्याने नाहक अनेकांचे बळी घेतले त्याची कबर होणे हे महाराष्ट्रासाठी दुखद घटना आहे. याकूब मेननची कबर अक्षरशः संगमरवरीच्या दगडाने बांधली जात आहे. त्यामुळे लोकांसमोर काय आदर्श ठेवणार. आमच्या पक्षाची हीच भूमिका आहे की, हे जे काही बांधकाम आहे, ते अत्यंत चुकीचे आहे.

तसेच म्हणाले हे बांधकाम ज्यांच्या काळात झालं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. उद्या बलात्कार आणि खुन करणाऱ्यांच्या कबरी बांधल्या जातील. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा मागणी करणार आहे की, सदरील प्रकरणाची कठोरात कठोर चौकशी करावी. एकनाथ शिंदे ते नक्की करतील .

शिरसाट म्हणाले, अशाच सर्व कारणांमुळे आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, आणि पक्ष सोडला. हा काही चांगुलपणा मागच्या सरकारमध्ये सुरू होता. त्याचा आम्हाला त्रास होत होता. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे शिरसाट म्हणाले.

तसेच म्हणाले, नवाब मलिक हे कशासाठी जेलमध्ये आहेत, दाऊद इब्राहिमच्या मनी लॉन्ड्रींगमध्ये त्यांचा सहभाग होता. दाऊदचे जे काही हस्तक असतील, त्याचे सहकारी असतील त्यांच्यासोबत बसने आम्हाला योग्य वाटत नव्हते, त्यामुळे आम्ही उठाव केला, असे शिरसाट म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now