Share

राज कुमारी निखंज: ६ मुलांना एकट्याने वाढवलं, अन् भारताला मिळाला एक महान क्रिकेटपटू

कपिल देव (Kapil Dev), भारतीय क्रीडा विश्वातील एक नाव, ज्यांनी भारताला विश्वविजेते बनवले. एक अष्टपैलू खेळाडू, ज्यांनी जेव्हा बॅट हातात घेतली तेव्हा त्याने अनेक महान गोलंजांना चकित केले. तसेच जेव्हा त्यांनी गोलंदाजीसाठी चेंडू हातात घेतला तेव्हा त्याने अनेक महान फलंदाजांचे शतक करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इतक्या वर्षानंतरही १९८३ मध्ये भारताच्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकात कपिल देव यांनी खेळलेली शानदार खेळी देश विसरू शकलेला नाही.(India got a great cricketer)

अनेकांनी कपिल देवला लाइव्ह खेळताना पाहिलं असेल किंवा नसेल, पण आजही त्या काळातील हाइलाइट्स पाहणं हे लाइव्ह मॅचपेक्षा कमी आनंददायी नाही. चंदीगडमध्ये जन्मलेल्या कपिल देव यांनी बालपणीच वडील गमावले. त्याची आई, राजकुमारी निखंज यांनी एकट्याने कपिल आणि त्यांच्या ६ भावंडांचे संगोपन केले. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांची आईच त्यांची गुरू बनली आणि कपिलला अशा वेळी प्रोत्साहन दिले जेव्हा खेळ हा वेळेचा अपव्यय मानला जात होता आणि शिक्षण हे सर्व काही होते.

प्रशिक्षणादरम्यान कपिलला संतुलित आणि पौष्टिक आहार मिळावा याची कपिल यांची आई नेहमीच काळजी घेत असे. त्यांनी अनेकदा कपिल देव यांना मैदानात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले. असे म्हटले जाते की कपिल जेव्हा १६ वर्षांचे होते तेव्हा त्यांना राष्ट्रीय क्रिकेट शिबिरात खूप कमी जेवण मिळायचे आणि त्यांनी आपल्या प्रशिक्षकाला सांगितले की मी एक वेगवान गोलंदाज आहे, त्यामुळे मला जास्त खाण्याची गरज आहे. यावर प्रशिक्षकाने ‘भारतात वेगवान गोलंदाज नाहीत’ असे उत्तर दिले.

1983 में पहला वर्ल्ड कप जितवाकर भारत में क्रिकेट क्रांति लाने वाले कपिल देव  का आज है जन्मदिन - today kapil dev bday who brought cricket revolution in  india after winning wc -

मग काय, पुढील तीन वर्षांत भारताचा पहिला वेगवान गोलंदाज बनून कपिलने प्रशिक्षकाचा मुद्दा चुकीचा सिद्ध केला. कपिलने पुढची दोन दशके भारतीय क्रिकेट संघाची गोलंदाजी आपल्या ताब्यात ठेवली. कपिल चांगला खेळाडू होता यात शंका नाही, पण त्याचा खरा विजय हा १९८३चा विश्वचषक होता. विश्वचषकासाठी प्रवास करण्याच्या काही महिन्यांपूर्वीच कपिल देव यांना संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. मागील दोन स्पर्धांमध्ये भारताने फक्त एक सामना जिंकला होता.

संघातील अनेक खेळाडूंना वाटले की संघ लवकरच विश्वचषकातून बाहेर पडेल, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पुढील सुट्ट्यांसाठी तिकिटेही बुक केली होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात २४ वर्षीय कपिल देव पहिल्यांदा मैदानात आले तेव्हा भारताने अवघ्या ९ धावा करून ४ विकेट गमावल्या होत्या. पण, तेव्हा कपिल देव यांनी मैदानावर अशी खेळी खेळली, ज्याची कल्पनाही त्यावेळी कोणीही केली नसेल. त्यांनी १७५ धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

हळूहळू, लॉर्ड्स स्टेडियमवर होणार्‍या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय क्रिकेट संघ पोहोचला आणि सर्व अडचणींवर मात करत भारताने दोन वेळा विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिजचा पराभव केला. भारत जिंकला आणि कपिल देव पहिल्या विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन मायदेशी परतले. या विजयाने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकला. या एका विजयाने लाखो लोकांना प्रेरणा दिली, न जाणो किती गल्ल्या आणि परिसरात या विजयाने त्या सर्व क्रिकेटपटूंच्या पिढीला जन्म दिला, जे आज भारताच नाव रोशन करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
जडेजाने मोडला कपिल देव यांचा हा विक्रम, ICC च्या ऑल राऊंडरच्या पंगतीत मिळवले पहिले स्थान
कपिल देवचा ३६ वर्षांपूर्वीचा विक्रम रविंद्र जडेजाने काढला मोडून; ‘हा’ विक्रम करणारा बनला दुसरा भारतीय फलंदाज
कसा आहे अजय देवगणचा रनवे 34 वाचा कपिल शर्मापासून रितेश देशमुखपर्यंत सगळ्यांनी दिलेला रिव्ह्यू
कपिल शर्माने तो प्रश्न विचारताच भडकला अजय देवगण, म्हणाला, तुझ्यापेक्षा तर जास्तच नंबर..

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now