Share

…तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ; शिंदें गटातील गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिंदे गट हा चांगलाच चर्चेत आहे. त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून शिंदे गटातील नेते मंडळी चर्चेत आहेत, विरोधकांकडून सतत सत्ताधारी नेत्यांची कोंडी  करण्याचा प्रयत्न आहे.

सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. अशातच पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ’50 खोके एकदम OK’ या घोषणेवरुन तर मोठा गदारोळ माजला. सत्ताधारी आणि विरोधक तर थेट आमने सामने आले. 50 खोके एकदम OK या घोषणाबाजीने विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांना हैराण करुन टाकले.

यावरून आता शिंदे गट देखील आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. ’50 खोके एकदम ओक्के’ या घोषणेवरुन शिंदे गटातील आमदाराकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे आता राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं असतानाच शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटलांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

वाचा काय म्हणाले, गुलाबराव पाटील..?

मुंबई येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी ’50 खोके एकदम ओक्के’ या घोषणेवरुन संताप व्यक्त केला. याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, ‘मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्‍यांची मजा आहे.’

तर अशातच काही दिवसांपासून ’50 खोके सर्व ओके अशा नवीन नवीन घोषणा निघाल्या. मात्र ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ असं ओपेन चॅलेंज पाटील यांनी दिलं.

दरम्यान, शिंदे गटात सामील झाल्यापासून मंत्री गुलाबराव पाटील हे चांगलेच चर्चेत आहेत. नुकतच त्यांनी केलेलं रोखठोक व्यक्तव्य हे चर्चेचा विषय बनला आहे. यावर अद्याप विरोधकांची प्रतिक्रिया आलेली नाहीये. विरोधक पाटील यांचे चॅलेंज स्वीकारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now