Cricketer, Raja Babu, Ghaziabad, Uttar Pradesh/ प्रतिभा आणि ज्ञान असलेल्या लोकांना परिस्थितीमुळे त्यांच्यासाठी नसलेल्याही नोकऱ्यांचा अवलंब करावा लागतो आणि ते खरच खूप वेदनादायक आहे. राजा बाबू या विशेष अपंग क्रिकेटपटूने 2017 मध्ये दिल्ली विरुद्ध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्तर प्रदेशसाठी 20 चेंडूत 67 धावा केल्या आणि आता तो ई-रिक्षा चालवत आहे. उदरनिर्वाहासाठी तो गाझियाबादमध्ये दूध विकत आहे.
मेरठमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या या व्यक्तीला ‘फ्लाइंग स्पिरिट’ म्हणूनही ओळखले जाते. या कामगिरीबद्दल बाबूचे खूप कौतुक करण्यात आले आणि त्याला खेळाच्या माध्यमातून बक्षीस देण्याचे आश्वासन दिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक स्थानिक व्यापारीही पुढे आला आणि त्याने क्रिकेटरला एक ई-रिक्षा भेट दिली, जी राजा आता आपला उदरनिर्वाह करण्यासाठी वापरत आहे.
दुर्दैवाने, कोविड-19 महामारीने राजा यांची क्रिकेट कारकीर्द उद्ध्वस्त केली. दिव्यांग क्रिकेट असोसिएशन (डीसीए) ही एक धर्मादाय संस्था जी राज्यातील दिव्यांग क्रिकेटपटूंना मदत करते, मात्र निधीच्या कमतरतेमुळे राजासारख्या लोकांना मदत करू शकत नाही. राजा म्हणाला, ‘खरंच आमचं कंबरडं मोडलं. सुरुवातीचे काही महिने मी दूध विकले आणि गाझियाबादच्या रस्त्यावर ई-रिक्षा चालवली.
राजा पुढे म्हणाले, माझे बाकीचे सहकारी त्या काळात मेरठमधील ‘दिव्यांग ढाब्यावर’ डिलिव्हरी एजंट आणि वेटर म्हणून काम करायचे. ढाबा असोसिएशनचे (DCA) संस्थापक आणि प्रशिक्षक अमित शर्मा यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. 31 वर्षीय राजा आता दिवसातून 10-12 तास ई-रिक्षा चालवतात आणि दिवसाला 200-300 रुपये कमावतात. या पैशातून ते पत्नी आणि मुलांचा उदरनिर्वाह करतात.
राजा म्हणाले, मी बहरामपूर ते विजय नगर दरम्यान दररोज 10 तास ई-रिक्षा चालवतो जेणेकरून मला फक्त 250-300 रुपये मिळू शकतील. मी मुश्किलीने घर खर्च भागवतो आणि माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीच उरत नाही. दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. राजा यांच्यासाठी सध्या परिस्थिती बिकट दिसत असली तरी भविष्याबाबत तो आशावादी आहे.
राजा यांनी सांगितले, 1997 मध्ये शाळेतून घरी परतत असताना रेल्वे अपघातात माझा डावा पाय तुटला. त्यावेळी माझे वडील रेल्वेत चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी होते आणि ते कानपूरच्या पंकी येथे तैनात होते. कुटुंब शाळेची फी भरू शकत नसल्याने अपघातानंतर माझा अभ्यास ठप्प झाला. अपघाताने माझे आयुष्य बदलले पण मी स्वप्न पाहणे सोडले नाही. 2016 मध्ये त्यांनाराजा यांना यूपी आणि गुजरातमध्ये अनेक सन्मान मिळाले. देशव्यापी स्पर्धेत त्यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. त्याच वर्षी बिहार सरकारने त्यांचा गौरवही केला होता. आशा आहे की त्याच्यासाठी गोष्टी चांगल्या होतील.
महत्वाच्या बातम्या-
नुपूर शर्माच्या पुतळ्याला फासावर दिल्यावर संतापला क्रिकेटपटू; म्हणाला, हा २१ व्या शतकातील भारत..
अनिल कुंबळेपासून ते राहुल द्रविडपर्यंत, जाणून घ्या काय करतात दिग्गज क्रिकेटपटूंची मुलं?
प्रथमच भारतीय क्रिकेटपटूला मिळाला विदेशात असा सन्मान, ‘या’ स्टेडियमला देणार गावसकरांचे नाव