तर आता चव्हाण यांनी पक्षाबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेसमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही तंत्रापासून देश वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने अंतर्गत प्रश्न त्वरित सोडवावेत. गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चिंतन करावे अन कारभार सुधारावा, असं त्यांनी म्हंटलंय.
याचबरोबर काँग्रेस पक्षाला वाचवायचा असेल निवडणूक घ्यायला हवी, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष कुणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडे घटनेची नोंद आहे, असं म्हणत चव्हाण यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.
तसेच पुढे बोलताना चव्हाण यांनी म्हंटलं आहे की, ‘विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना मतदान न करता पैसे घेऊन भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या ७ आमदारांवर कारवाई होत नसेल तर काय बोलणार असा दावाही चव्हाण यांनी केला आहे.
दरम्यान, चिंतन शिबिर घेणे गरजेचं असताना नव चेतना शिबिर घेण्यात आलं. पक्षात 24 वर्षात कोणतीच निवडणुक न झाल्यामुळे कोणतेच सामुदायिक निर्णय घेण्यात आले नाहीत. घटनेवर आधारित काँग्रेसमध्ये निवडणुका घ्या. कटपुतली सारखा अध्यक्ष नको”, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली.
महत्त्वाच्या बातम्या
मंत्री झाल्यावर मतदारसंघात परतलेल्या भुमरेंच्या कार्यक्रमाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली; वाचा नेमकं काय घडलं?
आता एकनाथ खडसेंनीही बोलून दाखवली नाराजी, म्हणाले, उद्धव ठाकरे सरकार असताना मला..
छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्व मान्य नाही, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, नेमकं काय घडलं?
Ramya Krishnan: ..त्यामुळे साऊथ इंडस्ट्री सोडून मी बॉलीवूडमध्ये थांबले नाही, बाहुबलीमधील शिवगामीचा मोठा खुलासा