Share

२५ वर्षे आमचा वापर करून घेतला, आता सत्ता आल्यावर तुम्हाला शिवसेना खुपायला लागली; ठाकरेंचा भाजपवर हल्ला

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेत नक्की काय बोलतील याबाबत चर्चा होत होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली आहे. (cm uddhav thackeray criticize bjp)

या सभेत उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच भाजपवरही हल्लाबोल केला आहे. एक काळ होता जेव्हा भाजप-शिवसेना राजकारणात अस्पृश्य होतो, करण हिंदुत्ववादी. २५-३० वर्षे तुम्ही आमचा उपयोग करून घेतला. आता सत्ता आल्यावर शिवसेना तुम्हालाच खुपायला लागली, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले आहे.

तसेच २५ वर्षे जे आमच्या मांडीवर बसलेले होते, तेच आता आमच्या छाताडावर बसलेले आहे, जे मित्र होते, ते वैरी झाले आहे, जे वैरी होते ते मित्र झाले आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

नामर्दांच हिंदुत्व आम्हाला शिकवू नका. मर्द असाल तर आधी काश्मिरी पंडितांची रक्षा करा. बाळासाहेब नसते तर तुम्ही दिल्ली काबीज केली असती का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी या सभेत उपस्थित केला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबावरही भाष्य केले आहे. जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुस्लिम लोकांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

तसेच देशाची रक्षा करता करता औरंगजेबाने बलिदान दिलं त्याला आम्ही परकं म्हणत नाही, तो आमचा आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच या शहराचे नामांतर मी करणार आहे, पण संभाजी महाराजांनी देखील आदर्श वाटेल असे नगर मी करणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now