काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर राजकारण चांगलेच रंगलेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे राज यांनी अयोध्या दौऱ्याबाबत केलेल्या घोषणेनंतर मनसैनिक तयारीला लागले आहेत.
मात्र अशातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली.
याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंनी उत्तर प्रदेशची माफी मागितली होती, असा दावा ब्रिजभूषण सिंह यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधात सिंह यांनी नवाबगंज ते नंदिनीनगर रॅली काढली आहे. यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत होते.
यावेळी बोलताना सिंह म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे हे खूप मोठे नेते होते. एकदा काहीतरी विधान केल्याने त्यांनीही उत्तर प्रदेशची माफी मागितली होती, असा दावा सिंह यांनी केला आहे. ‘राज ठाकरेंनी माफी मागावी. हीच ती वेळ आहे. माफी मागितल्याने कोण लहान होतं नाही, असं सिंह यांनी म्हंटलं आहे.
आता दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी संत-महंतांची बैठक होत आहे. या बैठकीला ५० हजार लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला आहे. याचबरोबर राज ठाकरेंच्या विरोधाला १० लाख लोक येतील असंही सांगितले जात आहे.
त्यामुळे आता राजकारण चांगलच तापणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या घरापासून नवाबगंज भागात रॅली काढली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. यामुळे आता राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शोरमा खाणं टाळा तो काही भारतीय खाद्यपदार्थ नाही; आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
पुन्हा ‘तो’ येतोय! महाराष्ट्रात जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट?; राजेश टोपेंचं मोठं विधान
‘हे फोटो कोणत्या बागेत काढलेत?’, शिवसेना नेत्यांचे फोटो ट्विट करत भाजपचा संतप्त सवाल
‘तुमचे आमदार निर्दोष, अनिलबाबू लवकर बाहेर येतील,’ रोहितदादांनी दिला शब्द