..म्हणून अकलूजच्या दोन जुळ्या बहिणींनी केला एकाच मुलासोबत विवाह; अखेर खरे कारण आले समोर

अकलूज : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. असे दिसते आहे की अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. अकलूजमधील एका लग्नाने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. भर मांडवात एका तरुणाने दोन मुलींशी लग्न केले. अतुल आवताडे या तरुणाने रिंकी आणि पिंकी पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींना सोबत घेऊन सप्तपदी घेतली.

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. अतुल अवताडे आणि रिंकी-पिंकी पाडगावकर यांनी पाहुण्यारावळ्यांच्या उपस्थितीत लग्न केले. माहलुंग परिसरातील गट क्रमांक 2 मध्ये राहणाऱ्या अतुल अवताडे या तरुणाचा रिंकी पाडगावकर आणि पिंकी पाडगावकर या जुळ्या बहिणींसोबतचा विवाह 2 डिसेंबर रोजी अकलूजजवळील गलांडे हॉटेलमध्ये झाला होता.

या जुळ्या बहिणींसोबत लग्न करण्याचे खरे कारण आता समोर आले आहे. रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणी आहेत. त्यामुळे त्या एकमेकींसोबतच मोठ्या झाल्या आहेत. दोघींनी अभियांत्रिकीचे शिक्षण एकत्र घेतले आहे. त्या नेहमी एकमेकींसोबत असतात. यापुढेही त्यांना एकमेकींसोबतच राहायचे आहे.

तसेच पाडगावकर कुटुंबीयांच्या आजारपणात अतुल अवताडे यांनी खूप मदत केली होती. त्यामुळे त्यांच्यात संपर्क वाढला. जसजशी दोन्ही कुटुंबं जवळ येत गेली तसतशी त्यांनी या कुटुंबाशी सोयरिकी जुळवण्याचा निर्णय घेतला. रिंकी आणि पिंकी एकत्र जन्माला आल्याने त्यांना नेहमी एकत्र राहायचे आहे.

त्यामुळे दोघींनी एकाच मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांची अतुलशी भेट झाली होती. या लग्नाला त्यांनी संमतीही दिली होती. आणि 2 डिसेंबरला तिघांच्याही लग्नाचे विधी पार पडले.

अतुल रिंकी आणि पिंकीच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांच्या लग्नावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

अतुल अवताडे हा मूळचा माळशिरस तालुक्यातील अकलूज गावातील तरुण आहे. तो रिंकी आणि पिंकी पाडगावकर यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आला. रिंकी आणि पिंकीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे दोघीही आईसोबत राहत होत्या.

पाडगावकर कुटुंबीयांच्या आजारपणात अतुल अवताडे यांनी खूप मदत केली होती. त्यामुळे त्यांच्यात संपर्क वाढला. जसजशी दोन्ही कुटुंबं जवळ येत गेली तसतशी त्यांनी या कुटुंबाशी सोयरिकी जुळवण्याचा निर्णय घेतला. रिंकी आणि पिंकी एकत्र जन्माला आल्याने त्यांना नेहमी एकत्र राहायचे आहे.

दोघीही उच्चशिक्षित आणि आयटी इंजिनीअर आहेत. ते आजही एकाच ताटात खातात, त्या दोघींचाही एकमेकींवर खूपच जीव आहे. त्यामुळे त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा विचित्र निर्णय कुटुंबीयांना मान्य नव्हता. पण, घरच्यांनी लग्नाला होकार दिला. अखेर 2 डिसेंबर रोजी गलांडे हॉटेल, जामापूर रोड, अकलूज येथे हा तिहेरी विवाह पार पडला.

वैवाहिक सुखाचे दिवस त्यांची वाट पाहत होते. पण त्यांच्या आनंदावर पाणी फेरले आहे. कारण या लग्नानंतर अतुलविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भर मांडवात जुळ्या बहिणींचा विवाह झाल्याने वराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या लग्नानंतर अतुलविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी अतुलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मालेवाडी येथील राहुल फुले यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. अतुलविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४९४ अन्वये अकलूज पोलीस ठाण्यात एनसीआरची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
Taimur : तैमूरला सांभाळणाऱ्या आयाच्या पगारासमोर काहीच नाही तुमचा पगार; आकडा ऐकून चक्कर येईल

Raj Thackeray : आमच्याकडे आहे एक पठ्ठ्या, उठ दुपारी अन् घे सुपारी असा त्यांचा कार्यक्रम असतो
Bihar : ऑर्केस्ट्रात गाणी वाजवायचा, कुठेही गेला की लग्न करून यायचा! पकडल्यावर निघाल्या 6 बायका