दिग्पाल लांजेकर यांनी संकल्प केलेल्या ‘शिवराज अष्टका’तील चौथे पुष्प म्हणजेच ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. २२ एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. परंतु, चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असूनही प्राईम-टाईम मिळत नसल्याने अभिनेता अक्षय वाघमारे याने संताप व्यक्त केला आहे.
अक्षयने यासंदर्भात त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत त्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण त्याच्या या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. काय आहे ती पोस्ट जाणून घेऊया.
अक्षयने पोस्टमध्ये लिहिले की, ‘नमस्कार पोस्ट मोठी आहे पण अत्यंत महत्वाची आहे. मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम. मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. याविषयी यापूर्वी देखील अनेकदा बोलले गेले आहे. पण पुढे काहीच साध्य झाले नाही’.
‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट ‘शेर शिवराज’ हा गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा एकच उद्देश होता की, महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा. नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा’.
‘स्वराज्याची स्थापना ते परकीयांचे आक्रमण या आणि अनेक बाबी या चित्रपटांद्वारे मांडल्या गेल्या आहेत आणि मराठी जनतेने उत्स्फुर्तपणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला. आतासुद्धा महाराष्ट्रातील जनता ‘शेर शिवराज’ हा चित्रपट पाहू इच्छिते. पण तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही’.
‘याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शोचे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स. सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात. आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे. चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत या सगळ्याचा विचार कोण करणार?’
‘आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल तर यासंदर्भात आवाज उठवायला नको का? जी व्यवस्था हे सगळं बघत आहेत त्यांनी याविषयी काहीतरी धोरण अवलंबणार आहेत की नाही? नाही तर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करतांना निर्माते देखील १० वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील’.
‘मराठी माणसाने म्हणजे सन्मानीय दादासाहेब फाळके यांनी ही चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत. जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे? हा पण एक प्रश्न आहे’.
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे तर इतर चित्रपटांबद्दल काय बोलणार ? बस झाला यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही. मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे. प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे…’
महत्त्वाच्या बातम्या :
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट खलनायक होता ‘हा’ अभिनेता, खिशात फक्त २७ रुपये घेऊन आला होता मुंबईला
कसा आहे अजय देवगणचा ‘रनवे 34’? वाचा कपिल शर्मापासून रितेश देशमुखपर्यंत सगळ्यांनी दिलेला रिव्ह्यू…
खूपच जबरदस्त आहे रनवे ३४; चित्रपट पाहून आल्यावर रितेश देशमुख म्हणाला असे काही की…