Mulayam Singh Yadav, Akhilesh Yadav, Sadhana Gupta, deceased/ उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे सरदार मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे निधन झाले. 82 वर्षीय नेताजी गेल्या 9 दिवसांपासून गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर होते, त्यानंतर सोमवारी सकाळी 8:16 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची बातमी समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली, त्यानंतर सपा कार्यकर्त्यांच्या डोळ्यात ओलावा आला.
मुलायमसिंह यादव जेवढे राजकारणात तरबेज होते, तेवढेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही जास्त चर्चेत असायचे. मग प्रकरण अतिशय सुंदर आणि धारदार नैन-नक्षावाल्या साधनावर पाहताक्षणी मरण्याचा असो किंवा मुलगा अखिलेशच्या तीव्र नाराजीशी तडजोड करण्याच असो. मुलायमसिंह यादव हे नेहमीच त्यांच्या कुटुंबात एकोपा निर्माण करताना दिसतात.
मात्र एक काळ असा होता की पिता-पुत्राच्या जोडीमध्ये मोठे मतभेद होते. यादरम्यान केवळ मुलायमसिंह यादव यांनीच कठोर निर्णय घेतला नाही, तर अखिलेश यांच्या जागी दुसरे कोणी असते तर त्यांनीही तेच केले असते. वास्तविक, ही संपूर्ण कहाणी त्यावेळची आहे जेव्हा 2003 मध्ये मुलायम सिंह यादव यांनी साधना गुप्ता यांना त्यांच्या पत्नीचा दर्जा जाहीरपणे दिला होता.
त्याच वर्षी मुलायम सिंह यांच्या पहिल्या पत्नी आणि अखिलेश यादव यांच्या आई मालती देवी यांचे निधन झाले. साधना गुप्ता यांना मुलायम सिंह यांची पत्नी म्हणून स्वीकारल्याने अखिलेश यादव त्यांच्या वडिलांवर खूप रागावले होते, असे अखिलेश यादव यांच्या बायोग्राफी ‘बदलाव की लहर’मध्ये म्हटले आहे. त्यावेळी ते फक्त 15 वर्षांचे होते.
साधना गुप्ताने आपल्या आईची जागा घ्यावी असे त्यांना मुळीच वाटत नव्हते. पण म्हणतात ना होणार असत त्याला कोणच टाळू शकत नाही. अखिलेश यादव यांच्याबाबतीतही तेच झाले. साधना गुप्ता यांना पत्नी म्हणून स्वीकारताना मुलायम सिंह यादव यांनी त्यांच्या मुलासोबत मोठा करार केल्याचेही अखिलेश यादव यांच्या बायोग्राफीत सांगण्यात आले आहे.
साधना आणि त्यांचा मुलगा प्रतीक यादव नेहमीच राजकारणापासून दूर राहतील, असे नेताजींनी अखिलेश यादव यांना सांगितले होते आणि तसेच झाले. मात्र जेव्हा परिस्थिती चांगली होऊ लागली, तेव्हा साधना गुप्ता यांची सून आणि प्रतीकची पत्नी अपर्णा यादव यांनी राजकारणात प्रवेश केला. बरं, दुस-या बायकोवरून वडील आणि मुलामधील हा तणाव नवीन नाही. या भावनेने आजही अनेक घरे फुटत आहेत. कारण पहिली पत्नी असूनही दुसरीशी लग्न केल्यानेच मुलाला वडिलांचा तिरस्कार निर्माण होतो.
त्यावेळी अखिलेश अवघ्या 15 वर्षांचे असल्याने ते कुणालाही आईची जागा द्यायला तयार नव्हते. युनायटेड किंगडममध्ये केलेल्या अभ्यासानुसार, घटस्फोटानंतर पालक सहजपणे नवीन जोडीदारासोबत पुढे जाऊ शकतात, परंतु या परिस्थितीतील मुलांना समजावून सांगणे खूप कठीण आहे. नवीन जोडीदाराला पालक म्हणून त्यांना लवकर स्वीकारता येत नाही. या काळात कुटुंब विस्कळीत होण्यावर त्याचा विपरीत परिणाम तर होतोच, शिवाय त्यांचा सामाजिक आणि मानसिक विकासही नीट होत नाही.
वयाच्या 15व्या वर्षी मुले थोडी शहाणी होत असली तरी हार्मोनल बदलांमुळे या वयात ते भावनिकदृष्ट्या कमकुवत होतात. आई-वडील विभक्त झाल्यावर त्यांना विविध प्रकारच्या प्रश्नांमध्ये अडकवण्याचे हेही एक मोठे कारण आहे. प्रेम, आंधळं असतं असं म्हणतात. द्वेषही तसाच आहे. जेव्हा माणसाच्या मनात कटुता निर्माण होते, तेव्हा तो त्याला खाली आणण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि जेव्हा राग वेळेवर उघडपणे समोर येत नाही तेव्हा हे अधिक घडते.
या दरम्यान, ऑक्सिटोसिन केवळ द्वेषाच्या संप्रेरकामध्ये बदलत नाही तर व्यक्तीच्या मनात असुरक्षिततेची भावना देखील निर्माण करते. मात्र, या काळात दोन व्यक्तींमधील सलोख्याची किंवा प्रेमाची भावना वाढली, तरच गोष्टी चांगल्या होऊ शकतात, याचा स्पष्ट पुरावा मुलायम-अखिलेश यांच्या नात्याने शेवटच्या क्षणापर्यंत दाखवून दिला.
महत्वाच्या बातम्या-
लघवीचा रंग सांगू शकतो तुम्हाला कोणता आजार झाला आहे, अशाप्रकारे जाणून घ्या आणि सावध व्हा
हिंदुत्ववादी भाजपला मुस्लीम करत आहेत मतदान, मोदींच्या सपोर्टमध्ये कसा आला पुर्ण समुदाय?
Mulayam Singh: समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि युपीचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे ८२ व्या वर्षी निधन