अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (Kajol) हे बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी जोडप्यांपैकी एक आहेत. व्यवहारात एकमेकांत विपरीत स्वभाव असणाऱ्या अजय देवगण आणि काजोलच्या लग्नानंतर, सर्वांनीच भाकीत केले होते की त्यांचे लग्न फार काळ टिकणार नाही. पण, अजय देवगण आणि काजोल गेल्या 23 वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. प्रेम असेल तर एकमेकांना चांगलं सांभाळता येतं हे या ताकदवान जोडप्याने दाखवून दिलं. (Ajay Devgn-Kajol’s love story is full of romance)
आज अजय देवगण आणि काजोल त्यांच्या लग्नाचा 23 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अजय देवगण आणि काजोल या दोघांनी 24 फेब्रुवारी 1999 रोजी लग्नगाठ बांधली. दोघेही आजच्या सर्वात यशस्वी जोडप्यांपैकी एक आहेत, पण सुरुवातीला दोघेही एकमेकांना पसंत करत नव्हते. पण, एकमेकांना पसंत नसताना ते कसे कपल बनले आणि प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले, ही कथा देखील बॉलिवूडच्या कोणत्याही रोमँटिक चित्रपटापेक्षा कमी नाही.

काजोलने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिची आणि अजय देवगणची भेट ‘हस्टल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. काजोल स्वभावाने खूप रागीट होती, तर अजय देवगण खूप शांत आणि अंर्तमुखी होता. काजोलला सेटवर हसणे आणि बोलणे आवडत असे, त्यामुळे अजय देवगणला तिची ही सवय अजिबात आवडली नाही. दोघांना एकमेकांना बघायलाही आवडत नव्हते. पण हळूहळू दोघांची ही विचारसरणी एकमेकांबद्दल बदलत गेली.

अजय देवगणने एका मुलाखतीत काजोलबद्दल सांगितले होते की, त्याला सुरुवातीला काजोल खूप अहंकारी वाटली. दोघेही एकमेकांपासून खूप वेगळे होते. गंमत म्हणजे त्या वेळी दोघेही आपापल्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होते. काजोलही अजय देवगणकडून तिच्या लव्ह लाईफशी संबंधित सल्ले घेत असे. अशा रीतीने हळूहळू एकमेकांचे नाते घट्ट होत गेले. काजोलच्या ब्रेकअपनंतर अजय देवगणने तिला मित्राप्रमाणे सांभाळले पण दोघेही एकमेकांना पसंत करू लागले.

काजोल तिच्या करिअरच्या शीर्षस्थानी होती आणि खूप चांगली कामगिरी करत होती, तर अजय देवगण पहिल्याच चित्रपटापासून सुपरस्टार होता. त्यानंतर काजोलला आयुष्यात थांबायचे होते, म्हणून तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा काजोल अवघ्या 24 वर्षांची होती. त्यांनीही त्यांच्या घरी मराठी रितीरिवाजानुसार लग्न केले. या लग्नाला काजोलचा जिवलग मित्र शाहरुख खानसह काही निवडक लोक उपस्थित होते.

अजय देवगण आणि काजोलच्या लग्नानंतरच्या हनिमूनची कहाणी काही कमी रंजक नाही. अजय देवगण आणि काजोल जवळपास दीड महिना हनिमूनला गेले होते. एका मुलाखतीत काजोलने खुलासा केला होता की, अजय देवगण आपल्या घराशी इतका जोडलेला आहे की त्याने हनिमूनला अर्धवट सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही त्यांचा हनिमून अधुरा सोडून मुंबईला परतले होते.

दोन दशकांपूर्वी जिथे अभिनेत्री लग्नानंतर आपलं करिअर सोडून जायच्या. काजोल ही अशी अभिनेत्री आहे जिने बॉलीवूडचा हा समज मोडला. लग्नानंतर काजोलने ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’, ‘फना’सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
दोघांना न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत. अजय देवगण आणि काजोल या दोघांनीही त्यांना सुरुवातीपासूनच लाइमलाइटपासून दूर ठेवले आहे. लग्नाच्या 23 वर्षांनंतरही अजय देवगण आणि काजोल यांचा एकमेकांचा आधार अधिकच घट्ट होत आहे. सुपरस्टार आणि डॉटिंग पालक अशा दोन्ही पद्धतीने ते आयडॉल कपल्स आहेत.
महत्वाच्या बातम्या-
युद्ध नको बुद्ध हवा, प्रख्यात लेखकाची फेसबुक पोस्ट चर्चेत, लोकांना दिला मोलाचा संदेश
शशी कपूर यांचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल, पत्नीबद्दल म्हणाले असं काही की भावनिक झाले लोक
मलिकांना अटक झाल्यावर थयथयाट करणारे एसटीचा संप मिटवण्यासाठी काहीच का करत नाहीत?
अखेर शालिनी हत्या प्रकरणाचा झाला उलगडा, प्रियकरानेच केली होती हत्या, कारण ऐकून पोलिसही चक्रावले