श्रीलंकेविरुद्धची मोहाली कसोटी ही भलेही विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 100वी कसोटी ठरली असेल पण या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे अष्टपैलू रवींद्र जडेजाची कामगिरी होती. जडेजाने या सामन्यात नाबाद 175 धावांची ऐतिहासिक खेळी तर केलीच पण 9 विकेट्सही घेतल्या. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.(adeja gets his historic performance award)
जडेजाच्या या कामगिरीमुळे श्रीलंकेला एक डाव आणि 222 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आता जडेजाला त्याच्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. खरं तर, रवींद्र जडेजाने नवीन ICC पुरुषांच्या कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तो आता 406 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
फेब्रुवारी 2021 पासून या पदावर असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरकडून त्याने हे स्थान मिळवले आहे. आता होल्डर 382 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. मोहाली कसोटीत जडेजाने कपिल देवचा विक्रम मोडला आणि 7व्या क्रमांकावर फलंदाजी करताना वैयक्तिक सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.
Jadeja reaches the summit 👑
Kohli, Pant move up ⬆️Some big movements in the latest update to the @MRFWorldwide ICC Men's Test Player rankings 📈
Details 👉 https://t.co/BjiD5Avxhk pic.twitter.com/U4dfnrmLmE
— ICC (@ICC) March 9, 2022
कपिल देवने खेळलेल्या 163 धावांचा डाव त्याने मागे सोडला आहे. शेवटच्या वेळी जडेजा ऑगस्ट 2017 मध्ये पहिल्या क्रमांकावर होता. तो आठवडाभर या क्रमांकावर राहिला होता. टॉप टेनमध्ये भारतासाठी रविचंद्रन अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनचे 347 गुण आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही त्याने बॅट आणि चेंडूने चांगली कामगिरी केली होती. अश्विनने 61 धावांची खेळी करताना 6 बळीही घेतले. त्याने या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज अस्लंकाची विकेट घेत कपिल देवचा 434 बळींचा विक्रम मागे टाकला होता.
सामन्यानंतर ब्रॉडकास्टरशी बोलताना संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज अश्विन म्हणाला की, गेल्या चार-पाच वर्षांत त्याने (जडेजा) खरोखरच खूप मोठा पल्ला गाठला आहे. मला वाटते की तो सध्या ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्यानुसार तो थोडा खालच्या क्रमवारीत खेळ करत आहे. त्याची फलंदाजी कमालीची वर गेलेली आहे. तो काय करतोय हे त्याला माहीत असते आणि तो ज्या प्रकारे फलंदाजी करतो त्यावरून ते दिसून येते.
अश्विन पुढे म्हणाला, सामन्याच्या मधीच आम्हा दोघांनाही कळले की जयंतने जास्त गोलंदाजी केली नाही. जो आमचा तिसरा फिरकीपटू कोण आहे. आमच्यासाठी त्याची साथ महत्त्वाची होती. त्यानंतर जड्डूने त्याची ओवर सोडून जयंतला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या-
तेव्हा लोक मला म्हणायचे की, तु हिरोईनसारखी दिसत नाहीस माधुरीने जुन्या आठवणींना दिला उजाळा
बड्या बड्या बाता मारणाऱ्या शिवसेनेची गोव्यात लाजिरवानी हार; मिळाली नोटापेक्षाही कमी मते
अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल..हारले..एक मासो आणि खंडी भर रस्सो!
मणिपूर आणि गोव्यात कोणाचे सरकार येणार? एबीपी न्यूज-सी वोटर ओपिनीयन पोलमधून झाला खुलासा