शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी – कॉंग्रेसला देखील गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का देणारा ठरला आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, ठाकरे गटाला मोठी गळती लागली असून अनेकांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी – कॉंग्रेस, मनसेमधील नेत्यांनी देखील आता शिंदे गटाची वाट धरली आहे. अशातच शिंदे गटातील एका आमदाराने एक मोठं वक्तव्य केलं असून राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीतील १२ बडे नेते फुटले असल्याच या आमदाराने म्हंटलं आहे.
माध्यमांशी बोलताना शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक मोठा दावा केला आहे. पाटील यांनी म्हंटलं आहे की, राष्ट्रवादीमधील १२ नेते फुटले आहेत, फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. सोलापूर जिल्ह्यातीलही मोठा नेता त्यात आहे. सर्व ठरलंय, जरा थांबा असं पाटील यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना पाटील यांनी एक आठवण देखील सांगितली आहे. म्हणाले, मी ९५ साली काँग्रेसचा आमदार होतो. त्यावेळी ५ वर्ष शरद पवार आम्हाला सांगायचे पुढच्या महिन्यात सरकार पडणार आहे. मात्र मनोहर जोशी, नारायण राणेंचे सरकार पडलेच नसल्याची आठवण पाटील यांनी करून दिली.
‘आताही विरोधक शिंदे – फडणवीस सरकार पडणार असं वक्तव्य करत आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेते शिंदे गटात मोठ्या प्रमाणात येतं आहेत. मात्र शिंदे गटात येणाऱ्यांना अडवण्यासाठी विरोधी पक्षातील नेते भीती निर्माण करत असल्याच पाटील यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सध्या राष्ट्रवादी – कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पवार यांना न्यूमोनियाची लागण झाली असून ते सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशातच पवारांना धक्का देणारी एक बातमी समोर येत आहे.
पक्षातील दोन नेत्यांनी राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच राष्ट्रवादीच्या चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांनीही प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज