जितेश शर्मा (Jitesh Sharma India U19 Captain) यांच्या कप्तानीत झालेल्या पहिल्या ग्रुप-बी सामन्यात भारताने यूएईवर तब्बल 148 धावांनी मात करत जोरदार सुरुवात केली. या विजयामागे सर्वाधिक चमकलेलं नाव म्हणजे अवघ्या 14 वर्षांचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi India U19 Star). त्याने केवळ 32 चेंडूत केलेले विक्रमी शतक सर्वांनाच थक्क करून गेले.
पहिल्याच चेंडूवर मिळालेलं नशिब आणि वैभवचा भेदक अटॅक
यूएईविरुद्ध भारतीय डावाची सुरुवात काहीशी नशीबवान ठरली. कारण वैभव सूर्यवंशीला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. त्या क्षणानंतर त्याने प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीची अक्षरशः धुळधाण उडवली. फक्त 17 चेंडूत अर्धशतक तर अवघ्या 32 चेंडूत शतक वैभव एवढ्या जोशात होता की तो द्विशतक गाठू शकला असता, पण 13व्या षटकात सीमारेषेजवळ झेल देत तो माघारी परतला.
वैभवची अंतिम आकडेवारी : 42 चेंडूत 144 धावा (15 षटकार, 11 चौकार) त्याच्या या तुफानी डावाने एकट्यानेच सामन्याचा वेग ठरवला.
कर्णधार जितेश शर्माचीही तुफान खेळी
कर्णधार जितेश शर्मा (Jitesh Sharma India U19 Captain) देखील मागे राहिला नाही.त्याने 32 चेंडूत नाबाद 83 धावा ठोकत भारताचा स्कोर 20 षटकांत 297 वर नेऊन ठेवला. यामुळे यूएईसमोर जवळपास अशक्य भासणारे आव्हान उभे राहिले.
जवळपास 300 धावांचे लक्ष्य पाहून यूएईची अवस्था सुरुवातीपासूनच बिकट होती. गुर्जपनीत सिंग (Gurjapneet Singh India Bowler) याने केवळ 18 धावांत 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि यूएईचा कोंडमारा केला. यूएईने 20 षटकं खेळली, पण त्यांची एकूण धावसंख्या झाली.
149 धावा जी वैभव सूर्यवंशीच्या धावसंख्येपेक्षा फक्त 5 धावा जास्त. शोएब खान (Shoaib Khan UAE Player) याच्या 63 धावांशिवाय यूएईचा इतर फलंदाजांकडून कोणतीच प्रतिकाराची चिन्हे दिसली नाहीत.
14 वर्षांच्या या तरुण खेळाडूने केवळ शतकच ठोकले नाही, तर आपल्या खेळाने संपूर्ण आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतच धमाल उडणार असल्याचा इशारा दिला आहे. भारताचा विजय अनेक कारणांनी खास ठरला, पण वैभव सूर्यवंशीची ही तुफानी कामगिरी सर्वांत चर्चेत राहिली.