मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विश्वासू असलेले शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांची टिटवाळा येथील १०० कोटींची जमीन ईडीने जप्त केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या टिटवाळा येथील जमीनीला किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट दिली.
प्रताप सरनाईक यांनी एनईसीएलच्या १०० कोटीच्या घोटाळ्याच्या रकमेतून ७८ एकर जमीन घेतली होती. ही जमीन ईडीने जप्त केली आहे. त्याबाबतची नोटीस किरीट सोमय्या यांनी सादर केली आहे. राज्यात सत्तेत असलेले ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान १०० कोटी रूपये प्रताप सरनाईक यांनी परत न केल्यास ईडी त्यांच्या अन्य मालमत्ता जप्त करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारने जनतेची काळजी करावी- सोमय्या
ठाकरे सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर निघत असल्याने हे सरकार घाबरले आहे. विरोधकांवर दबाव आणण्यासाठी ठाकरे सरकारने जाणूनबुजून सुरक्षेत कपात केली आहे. या सरकारने जनतेची काळजी करावी असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
महत्तवाच्या बातम्या-
‘ज्या गालावर पोलिसांनी मारलं, त्याच गालावर राज ठाकरेंनी फिरवला प्रेमाचा हात’
तब्बल ७ वर्षांनी भिडे गुरूजींचा भिमा कोरेगाव दौरा; पोलिसांनी थांबण्यास केला मज्जाव
“ठाकरे सरकारचा घोटाळा कधीही बाहेर येईल”; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची तक्रार