शुक्रवारी निवडणूक आयोगाने ठाकरेंना धक्का देणारा निर्णय दिला आहे. त्यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाने ७८ पानांचा निकाल दिला आहे. या ७८ पानांंमध्ये संपुर्ण निकालाबाबत सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने शपथपत्रावरुन आणि शिवसेनेच्या घटनेवरुन हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. निर्णयासाठी ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात शपथपत्रे देण्यात आली होती. पण निवडणूक आयोगाच्या निकालात आमदार आणि खासदार कुणाकडे जास्त हा महत्वाचा मुद्दा ठरला.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५५ पैकी ४० आमदार आहे. तसेच शिवसेनेचे १३ खासदारही त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे आपणच खरी शिवसेना असल्याचे एकनाथ शिंदेंनी दावा केला होता. तर उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे १५ आमदार आणि ६ लोकसभेचे खासदार असल्याचे म्हटले होते.
अशात हैराण करणारी माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाला १५ आमदार आणि ४ खासदारांनीच शपथपत्र दिले आहे. म्हणजेच शपथपत्र देतानाही दोन खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचे दिसले. त्यांची नावेही आता समोर आली आहे.
निवडणूक आयोगाने जेव्हा शपथपत्र मागितले तेव्हा गजानन किर्तीकर आणि संजय जाधव यांनी शपथपत्रे दिली नाही. त्यानंतर पुढच्या काही दिवसांतच दोघांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता उद्धव ठाकरे यांच्याकडे ४ खासदार आहे. तर १५ आमदार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने निकाल देताना काही गंभीर आरोप केले आहे. २०१३ आणि २०१८ मध्ये शिवसेनेच्या काही घटनांमध्ये बदल करण्यात आले होते. ते लोकशाहीला धरुन नव्हते. पक्षामध्ये निवडणूका होणं गरजेचं असते. पण शिवसेनेत नेमणूका झाल्या. हे बदल निवडणूक आयोगाला कळवले नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आधी म्हणाले काहीही झालं तरी ठाकरेंसोबतच राहणार, पण अमित शहा येताच फिरली सुत्रे अन् रात्रीतून..
मोठी बातमी: संजू सॅमसन निवृत्तीच्या तयारीत, BCCI ने वारंवार दुर्लक्ष केल्याने घेतला मोठा निर्णय
भाजप शिंदे गटाला लोकसभेच्या फक्त तीनच जागा देणार? अमित शाहांच्या वक्तव्यामुळे शिंदे गट अस्वस्थ