मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कृषी कायद्यांना स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
याबाबत पवारांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, ‘कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
A welcome decision taken by the Apex Court of India to put on hold the implementation of three farm bills and set up a four member committee to resolve the issues. #SupremeCourt #FarmLaws
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 12, 2021
तसेच ते पुढे म्हणतात, ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चेसांठी चांगले वातावरण निर्माण होईल, तसेच शेतकऱ्यांचे हितसंबंध विचारात घेऊन निर्णय होतील, अशी अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळेंनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार….
कोर्टाच्या स्थगितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. ‘केंद्र सरकारचा अत्याचार सहन करत शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर न्याय मागत आहेत. पण त्यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं. कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजून घेत त्यांना न्याय द्यावा,’ असे त्या म्हणाल्या.
‘सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देताना या कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत. सरकारने आतातरी संवेदनशील व्हायला हवं,’ असेही सुप्रिया सुळे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
शेतकरी आंदोलन : सुप्रिया सुळेंनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार; मोदी सरकारकडे केली ‘ही’ मागणी
शेतकरी आंदोलन! राहुल गांधी केंद्र सरकारवर बरसले; म्हणाले…
मुख्यमंत्री साहेब, माझं लग्न करुन द्या; युवकाचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र